मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात उद्धव ठाकरे सरकारला एक महिना पूर्ण होत असतानाच मागील काही दिवसापासून अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्विटर युद्ध सुरु झाले आहे. अमृता फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिवसेनेने आपल्या शैलीत प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर बोचरी टीका केली. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीस आणि शिवसेनेची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच आता युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या टीकेमुळे भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते आणि आमदार आशीष शेलार यांनीही अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला होता. अमृता फडणवीस आणि शिवसेनेत सुरु असलेल्या ट्विर वॉरमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या लोकांनी दिलेला शब्द पाळला नाही. जे लोक सत्तेपासून दूर गेलेत त्यांच्या मनातलं दु:ख मला कळतंय. आमच्यावर जनतेने जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. ट्रोल करणाऱ्यांवर शिवसैनिकांनी लक्ष देऊ नये. त्यांना काहीही करु द्या. काही ठिकाणी इंटरनेट बंद नाही. त्यामुळे त्यांना खुशाल ट्वीट करु द्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/
- झोपेत चालण्याच्या सवयीची ‘ही’ आहेत ४ कारणे, जाणून घ्या
- भारतात वेगाने वाढत आहे तणावाचा स्तर, ‘या’ ५ गोष्टी जाणून घ्या
- ‘सोरायसिस’बाबत ५ महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, असा आहे ‘हा’ आजार
- अंड्याच्या कवचाचे ‘हे’ १० फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?