मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2014 मध्ये शिवसेनेचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून या निमित्तानं शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेलं विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेच. याशिवाय शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारंही आहे. हे विधान गांभीर्यानं घ्यावं लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचं स्पष्ट होतं. यावर शिवसेनेला स्पष्टीकरण द्यावं लागेल.” असं आव्हानंही त्यांनी केलं.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, “2014 पासून काँग्रेस-शिवसेना आघाडीचे प्रयत्न सुरू होते हा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे समोर आला आहे. दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे शिवसेनेचं वागणं क्लेशदायक आहे.” दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे असं म्हणत दुजोरा दिला होता.
काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?
माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की, फक्त यावेळीच नाही तर 2014 मध्ये देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून आले होते. दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, “राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता.” असं त्यांनी स्पष्ट केलं.
- पालकांनो सावधान ! मुलांच्या बौद्धिक क्षमतेबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले ‘हे’ 6 मुद्दे
- जेवल्यानंतर पिऊ नका थंड पाणी ! ‘हे’ आहेत 4 धोके, जाणून घ्या
- ‘या’ 9 समस्यांवर केवळ एकच सहज सोपा उपाय, जाणून घ्या कोणता
- ‘या’ 4 कारणांमुळे सतत होतो सर्दी-खोकल्याचा त्रास
- मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे 3 फायदे ! अशी घ्या काळजी
- सायकल चालवल्याने ‘या’ 4 रोगांचा धोका होतो कमी ! जाणून घ्या
- हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवश्यक, ‘या’ 5 स्टेप्स वापरा