नगरमध्ये दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ ! राष्ट्रवादीचे आ. जगतापांवर शिवसेनेचा ‘हल्ला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या पाच वर्षात नगर मागे गेले. नगरला दहशत व खोट्या गुन्ह्यांची साथ लागली. ही साथ डेंग्यू पेक्षाही भयानक असल्याचे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

शहर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार अनिल राठोड यांच्या प्रचार निमित्त आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. गोऱ्हे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत ज्यांनी प्रतिनिधित्व केले, त्यांनी कोणतीही विकासकामे केली नाही. त्यामुळे आता आपल्याला पुन्हा राठोड यांना निवडून देऊन शहराचा विकास पुणे, मुंबईच्या धर्तीवर करायचा आहे.

नगरमध्ये सुरक्षेचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. तोसुद्धा प्रामुख्याने सोडवावा लागणार आहे. नगरसारख्या ठिकाणी अनेक खोटे-नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले जातात. या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत व या प्रकरणाची चौकशी केली पाहिजेत, असे गोऱ्हे म्हणाल्या.

…अभी दरवाजा बंद है
शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी तुम्ही दारामध्ये उभे होतात. मात्र, काम पाहूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभी दरवाजा बंद हो गया, आता प्रयत्नही करू नका, असा टोला गोऱ्हे यांनी विरोधकांना लगावला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी