एमएलसी निवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर शिवसेना म्हणाली – ‘अति आत्मविश्वासने आधार गमावत आहे पक्ष’

मुंबई : शिवसेनेने म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांची निवडणुकीचे निकाला सांगतात की, अति आत्मविश्वासमुळे भाजपा राज्यात आधार गमावत आहे. शिवसेनेने म्हटले की, भाजपासाठी सर्वात धक्कादायक निकाल नागपूर पदवीधर मतदार संघातून आला आहे, जिथे त्यांची पाच दशकांपासून मजबूत पकड होती.

भाजपाचा पाया डळमळीत होऊ लागला : शिवसेना
नितिन गडकरी यांनी नागपूर पदवीधरांचे समारे 25 वर्षापर्यंत प्रतिनिधित्व केले. शिवसेनेने सामनातून म्हटले आहे की, गडकरी यांच्या अगोदर विधान परिषदेत नागपूर पदवीधरांचे प्रतिनिधित्व संघाचे नेते गंगाधर पंत फडणवीस करत होते. ज्यांचे पुत्र देवेंद्र फडणवीस आहेत. शिवसेनेने म्हटले की, संघाचे मुख्यालय नागपुरमध्ये आहे. परंतु संघाच्या विचारधारेचे संघटन मजबूत असूनही नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेने म्हटले की, विधानसभा निवडणुकीतच भाजपाचा पाया डळमळीत होऊ लागला होता. अमरावती शिक्षक मतदार संघात सुद्धा भाजपा पराभूत झाली आहे. धुळे-नंदुरबार विधान परिषदची जागा काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. परंतु, हा पटेल यांचा व्यक्तीगत विजय आहे, भाजपाचा विजय नाही.

भाजपाला अति आत्मविश्वास होता : शिवसेना
पुणे पदवीधर मतदार संघसुद्धा भाजपाचा गड मानला जात होता, जिथे अगोदर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर विधान परिषद सदस्य होते. भाजपाचे पदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पदवीधर मतदसंघाचे नेतृत्व करत होते. या दरम्यानच ते महाराष्ट्राचे महसुल मंत्री, प्रदेशाध्यक्ष बनले. मात्र, आता त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्याचा पदवीधर मतदार संघ भाजपाने गमावला आहे. शिवसेनेने म्हटले की, भाजपाला अति आत्मविश्वास होता. त्यांना वाटत होते की, त्यांना कुणाचीही गरज नाही आणि आपल्या बळावर जिंकता येईल. बरे झाले ते पराभूत झाले. शिवसेनेने म्हटले की, महाविकास आघाडीने सर्व जागांवर चांगल्याप्रकारे निवडणूक लढली आहे आणि एकमेकांसाठी काम केले. नागपुरमध्ये काँग्रेसचे सर्व घटक एकत्र आले विरोधकांशी एकत्रित लढले. जर असे होत असेल तर नागपुरच्या विजयासारखा चमत्कार सुद्धा होऊ शकतो.