मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आजपासून शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजिप पवार यांनी पुण्यामध्ये तर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत या शिवभोजन योजनेचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते पहिली थाळी लाभार्थीला देण्यात आली. या थाळीमध्ये भात, डाळ, भाजी, लोणचे, दोन चपात्या होत्या. यावेळी अजित पवार यांनी ज्यांची ऐपत असेल त्यांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन केले.
गरीबांना पोटभर जेवण मिळावे हा या योजने मागचा उद्देश आहे. 150 थाळ्या देण्यात येणार आहेत. दरम्यान, या शिवभोजन थाळीचे दर शहरात आणि ग्रामीण भागात वेगवेगळे आहेत. शहरीपेक्षा ग्रामीण भागात 15 रुपये कमी ठेवण्यात आले आहेत. यामुळे ज्यांची पूर्ण पैसे देऊन जेवण घ्यायची ऐपत आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. तसेच सुरूवातीला ही योजना राबविताना काही त्रूटी असू शकतील, मात्र त्या समोर आल्यानंतर तातडीने त्या दूर केल्या जातील, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृहात शिवभोजन थाळीच्या योजनेचे उद्घाटन केले. ही थाळी 10 रुपयांत उपलब्ध करून देण्यात अली आहे. यावेळी त्यांनी पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे, म्हटले आहे.
दरम्यान, शासन निर्णयानुसार गरीब व गरजू व्यक्तींना १० रुपयांत आहार उपलब्ध करून देण्यासाठी शिवभोजन योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्याला एक हजार ३५० थाळ्यांचे टार्गेट आहे. योजनेत महिला किंवा महिला बचत गटांंना प्रामुख्याने हे काम दिले जाणार आहे. या केंद्रांवर वरण-भात, पोळी-भाजी, असे पदार्थ दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यांनतर या शिवभोजन थाळीचा स्वाद घेणाऱ्यांचा एक फोटो क्लिक केला जाणार असून मोबाइल नंबर घेऊन त्यावर ‘स्वाद चाखल्याबद्दल धन्यवाद,’ असा एसएमएसही पाठवण्यात येणार आहे. सध्या हे केंद्र प्रायोगिक तत्त्वावर असून तेथील गर्दी पाहून तेथील थाळी कमी करायची किंवा वाढवायची, याचा निर्णय होणार आहे. एका केंद्रावर जास्तीतजास्त १५० आणि कमीतकमी ७५ थाळ्यांचे वाटप होणार आहे.
- ‘ही’ आहेत कानाच्या ‘कॅन्सर’ची 7 लक्षणे; चुकूनही करू नका दुर्लक्ष !
- दर 20 मिनिटांनी ‘वॉक ब्रेक’ घ्या, हृदयरोग असूनही मिळेल ‘लाँग लाईफ’ !
- ‘या’ 5 पदार्थांमुळे वाढतो ‘ताण’; मेंदूसाठीही ठरतात घातक !
- ‘या’ 4 घरगुती उपायांनी मिळवा खोकल्यापासून सुटका !
- ‘नागीण’ आजाराची ‘ही’ आहेत 4 कारणे, जाणून घ्या यावरील उपाय
- बहुगुणकारी ‘लवंग’ चे सेवन करा आणि ‘या’ 5 समस्यांतून मुक्तता मिळवा
- ‘न्यूमोनिया’ वर गुणकारी ठरतात ‘हे’ 5 घरगुती उपाय !