‘उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे नियमांप्रमाणेच वागले, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बुधवारी राज्यसभेत झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण रंगलं आहे. उदयनराजे भोसले यांना जय भवानी, जय शिवाजी या घोषणाला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. याच मुद्यावरून भाजपर टीका केली जात असताना खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लिन चिट दिली आहे. व्यंकय्या नायडू हे सभागृहाच्या नियमानुसार वागले, पण छत्रपती शिवरायांबद्दल आमच्या देखील काही भावना आहेत. त्या आम्ही मांडत आहोत. जय भवानी, जय शिवाजी ही घोषणा जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच महत्त्वाची असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

साताऱ्याचे भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या घोषणेवर आक्षेप घेतला. रेकॉर्डवर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी सांगितलं. यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन पक्षांनी भाजपला घेरलं आहे. खासदार संजय राऊत यांनी भाजपचे या विषयांवर ‘तोंड बंद’ आंदोलन सुरु झालं आहे. तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्याकडून सांगली आणि सातारा जिल्हा बंदची घोषणा अद्याप झालेली नाही, असा प्रश्न सकाळी ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

यावर उदयनराजे भोसले यांनी या सगळ्या वादावर खुलासा केला होता. राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाच नाही. सभागृहात असं काही घडलंच नाही. शरद पवारही तिथं होते. त्यामुळे कुणीही राजकारण करु नये. यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांना क्लिन चिट दिली. नायडू हे उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. नियमांचे काटेकोर पालन करणारे आहेत. त्यांच्या दृष्टीनं म्हाणाल तर ते बरोबर आहेत. त्यांच्याइतका संसदीय लोकशाही व कामकाजाचे कायदे माहीत असलेला नेता आजवर मी पाहिला नाही. आम्ही सगळे त्यांचे ऐकतो त्यांचा आदर करतो.

हा वाद वाढू नये असे आम्हालाही वाटते. पण शिवरायांबद्दल आमच्या काही भावना आहेत. नियम आणि भावना या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जय भवानी आणि जय शिवाजी ही घोषणा नियमबाह्य किंवा घटनाबाह्य नाही. ती असू नये, असं आमचं म्हणणं आहे. जय हिंद आणि वंदे मातरम् इतकीच ही घोषणा महत्त्वाची असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.