शिवसेनेची भाजपवर टीका, म्हणाले – ‘अजितदादा पत्र चोरत असताना ‘टॉर्च’चा ‘लाईट’ मारण्यासाठी भाजपचे कोण लोक होते?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पुन्हा एकदा कुरघोडीच्या राजकारणास सुरुवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवरून भाष्य केलं. त्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीच पण त्याचबरोबर शिवसेनेवरही त्यां shivsena नी निशाणा साधला. त्यावरून आता शिवसेनेने shivsena सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे. ५४ आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांनी चोरणे हे नैतिक कि अनैतिक असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी करणे म्हणजे

मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे. याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच चंद्रकांत पाटलांनी केले आहे.
मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून अजित दादा पत्र चोरत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? असा सवालच शिवसेनेनं shivsena उपस्थितीत केला.
एवढेच नाही तर ‘एक संशयास्पद, गोपनीय विषय बंद पेटीत पडला होता.
त्याचे टाळे चंद्रकांतदादांनी उघडले. राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला खरा, पण तो भाजपच्या चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला’ असा सणसणीत टोलाही सेनेनं चंद्रकांत पाटलांना लगावला.

सध्या विरोधी पक्षाने उचलली जीभ लावली टाळ्याला असला प्रकार सुरू केला आहे.
दीड-दोन वर्षांपूर्वीच्या झालेल्या अजित-देवेंद्र’ यांच्या शपथविधीच्या पहाट सोहोळ्यातच आजही भाजपचे नेते गुंतून पडले आहेत.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले की, घाईघाईत अजित पवारांबरोबर सरकार बनवले ही आपली चूकच झाली.
असे केल्याने आपल्या प्रतिमेस तडा गेल्याचेही त्यांनी मान्य केल्याने त्यांच्यापुरता या प्रकरणावर पडदा पडला,
परंतु चंद्रकांत पाटील यांचे मन पहाटेच्या शपथविधीतून बाहेर पडू देत नाही.
राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी.
आता चंद्रकांत पाटील यांनी एक स्फोट केला की,
भाजपच्या माध्यमातून अजित पवार यांनी ज्या ५४ आमदारांचे पत्र राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे.

हे पत्र शरद पवारांच्या ड्राव्हर मधून अजित पवारांनी चोरले.
हे असे पत्र चोरणे नैतिक की अनैतिक, असा प्रश्न पाटलांनी विचारला आहे.
त्याचा हा स्फोट म्हणजे पोरखेळ आहे.
राजकारणात व युद्धात सर्व माफ असते. चढाई करून विजय मिळवायचा असतो.
त्यासाठी अनेकदा नैतिक-अनैतिकेच्या पलीकडे जाऊन कार्य सिद्धीस न्यायचे असते.
अजित पवारांचे ते पत्र हा भाजप व अजित पवारांतील गुप्त करार असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत गुप्तच राहायला हवा होता.
मात्र तसे न करता चंद्रकांतदादांनी विनाकारण भांडाफोड करून करत भविष्यात मोठो राजकारण करण्यास आपण सक्षम नसल्याचे दाखवून दिले’ असा सणसणीत टोला पाटलांना लगावला.

गोपनीय गोष्टीतून यश प्राप्त झाले नाही तर त्या गोपनीयतेचा असा बोभाटा करणे योग्य नाही.
पण भडकलेल्या चंद्रकांतदादांनी लोकांसमोर पहाटेच्या शपथविधीचे सर्व गुप्त कट आणले.
पण त्यांच्या भांडाफोडीत इतरही अनेक कंगोरे आहेत.
अजित पवार यांनी पवारांच्या डॉवरमधून पत्र चोरले हा आरोप निव्वळ भंपक आहे.
५४ आमदारांच्या सहीचे पत्र अजित पवारांना चोरण्याची आवश्यकता नाही. कारण ज्यावेळी पहाटे हे सर्व सुरू होते त्यावेळी ते राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवडले गेलेच होते त्यामुळे त्यांच्याकडे आमदारांच्या सहीचे पत्र होते.
ते चोरले किंवा बनावट पद्धतीने मिळवले असे सांगणे हा राजकीय बालिशपणा आहे.असेही शिवसेनेनं म्हंटल आहे.
देशाच्या राजकारणात अधूनमधून पहाटेचे प्रयोग होतच असतात.

दुसरे असे की, अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे.
अजित पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजप नेत्यांनी स्वीकारणे,
त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही,
तर बेकायदेशीरदेखील ठरते. शिवाय हा मोठा अपराधदेखील आहे! चोरी हा गुन्हा आहेच,
पण चोरीचा माल विकत घेणे हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे.
त्यामुळे चोरलेल्या पत्राचा राजकीय व्यापार करणाऱ्या भाजप व त्यांच्या पुढाऱ्यांवर निवडणूक आयोगाने व पोलिसांनी फौजदारी गुन्हेच दाखल केले पाहिजेत’ अशी मागणी सामनातुन शिवसेनेनं केली आहे.

एकीकडे अजित पवारांवर पत्र चोरल्याचा आरोप तर दुसरीकडे ‘दगा’ दिला म्हणून शिवसेनेला धडा वगैरे शिकविण्याचा प्रयत्न भाजपने केला, असेही सांगतात.
त्यातच प्रयत्न फसला असेही सांगतात. महत्त्वाचे म्हणजे असलेल्या नसलेल्या गोष्टी उगाळत बसल्याने त्यातून केवळ मनस्ताप होतो.
चंद्रकांत दादांसारख्या ज्येष्ठ नेत्याला हे सांगायची गरज नाही सत्ता गेल्याचे शल्य ठीक आहे,
पण दादा अशी किती तगमग करून घेणार आहात?’ असा सवालही शिवसेनेनं shivsena उपस्थित केला आहे.

Also Read This : 

 

Pune Fire News | आगीतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर, अजित पवारांनी दिले चौकशीचे आदेश

 

गर्भधारणेत मधुमेह असलेल्या स्त्रियांनी ‘या’ पध्दतीनं वजन कमी करावे; जाणून घ्या