मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी शिवसेनेची भाजपवर खरमरीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर भाजपने मनसुख मृत्यू प्रकरणी राज्य सरकारविरोधात आवाज उठवला आहे. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख मृत्यू प्रकरणी काही प्रश्न उपस्थित केले आहे. एकूणच भाजपाकडून प्रत्येक घटनेची होणारया राजकारणावरून शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातुन भाजपवर टीका करत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं आहे. मृत्यू कोणाला चुकला आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो.

मनामध्ये संशय निर्माण करतात अशी स्थिती असताना राजकरणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणीही विरोधी पक्ष तेच करत आहे. तपास सुरु असताना विरोधी पक्षांकडून संदिग्ध परिस्थिनिर्माण करण्याचे काम सुरु आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी खरमरीत टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत असताना उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्कार्पिओ आढळते. चालक पसार झालेला असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हि बाब लक्षत येते यानंतर सर्वत्र धावपळ सूरु होते. या सिनेमाची कथा-पटकथा प्रत्यक्षात पडद्यावर आली तर हा बिगबजेट सिनेमा पहिल्या शोलाच कोसळला असता, इतके कच्चे दुवे या रहस्यपटात आहेत. दुसरीकडे या रहस्यपटाचा शेवट ‘हॉरर’ने घेतल्याने काहीतरी गडबड नक्कीच आहे. जी स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत संशयास्पदरीत्या सापडला आहे. मनसुख यांचा मृत्यू संशयास्पद, तितकाच रहस्यमय आहे’ असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

शुक्रवारी मनसुखप्रकरणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहे. त्यामुळे विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना हा प्रकार घडल्याने ‘मारुती कांबळेचे काय झाले? ’प्रमाणे मनसुख हिरेनचे काय झाले या प्रश्नावर विधिमंडळात चौफेर हंगामा होऊ शकेल.

पूजा चव्हाण, मनसुख हिरेन, स्फोटकांनी भरलेली गाडी हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातील विषय आहेत. विरोधी पक्षाने या सगळ्यांवर जोरकसपणे आपले मुद्दे मांडले. फडणवीस यांनी गृहमंत्रीपॅड सांभाळले आहे. त्यामुळे त्याचा त्यांना आता फायदा होत आहे. पोलीस खात्याच्या संदर्भातील आतली माहितीही त्यांना मिळते. फडणवीसांनी मनसुख प्रकरणातील काही वेगळी माहिती मांडली, पण त्यांनी जाहीर केलेली माहिती म्हणजे अधिकृत तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष नाही, मात्र मनसुख प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होईल व सरकारला उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही’ असंही सेनेनं सावधपणे उत्तर दिलं.

ज्या परिसरात गाडी सापडली त्या परिसरात सुरक्षा व्यवस्था सरकारपेक्षा मजबूत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीसी टीव्ही त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहेत. कुणाही ऐऱ्यागैऱ्यास तिकडे फिरकता येत नाही. अशातच एक स्फोटकांनी भरलेले बेवारस वाहन तेथे येतेच कसे? याप्रकरणी मुंबई-ठाण्यातील ८०० हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, पण तपास इंचभरही पुढे सरकला नाही. या प्रकरणातील म्हत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरेन यांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. हिरेन यांच्या मृत्यूने त्याने कुटूंब उघड्यावर पडले. माझे वडील आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हते. तसेच ते कोणत्याही तणावात नव्हते. फोन आल्यानंतर ते भर गेले आणि पुन्हा परतलेच नाही अशी माहिती मनसुखच्या मुलाने दिली. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही’ असंही सेनेनं म्हटलं आहे.