दुबई : पोलीसनामा ऑनलाईन
आशिया चषकची १४ वी स्पर्धा दुबई येथे सुरु आहे. ठरावानुसार स्पर्धा भारतात होणार होती पण भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील राजकीय वादविवाद आणि दोन्ही देशांच्या सिमेवरील भीषण तणावामुळे स्पर्धा संयुक्त रब अमिरातीतील दुबई येथे हलविण्यात आली. या तणावामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि चॅनलची न्यूज अँकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसली. ‘स्वच्छ भारत’ शब्दावरून शोएब अख्तरचा पारा चढला आणि त्याने भारतीय न्यूज अँकरला उलट उत्तर दिले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच. या सामन्याचे समीक्षण करण्यासाठी दोन्ही देशांमधील माजी खेळाडूंना वाहिनींवर बोलावण्याची परंपरा आहे. आपला संघ कसा वरचढ आहे, हे सांगण्यात माजी खेळाडूंमध्येही अनेकदा जुंपलेली पाहायला मिळाले आहे. यावेळी मात्र खेळाडू आणि चॅनलची न्यूज अँकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झालेली दिसली.
आशिया चषक स्पर्धेतील अंतिम चार गटातील सामन्यापूर्वी अख्तरला बोलावण्यात आले होते त्यावेळी न्यूज अँकरने साखळी गटातील पराभवाची आठवण करून देताना वापरलेल्या ‘स्वच्छ भारत’ या शब्दावर अख्तरचा राग अनावर झाला. शोएब अख्तरशी बोलताना ती म्हणाली,” भारतात स्वच्छता अभियान सुरू आहे आणि भारतीय क्रिकेट संघाने ते फारच मनावर घेतलेले दिसत आहे.