Shraddha Walkar Murder Case | ‘चौकशी दडपण्यात आली का?’ भाजपचे नेते आशिष शेलार यांचा श्रद्धाच्या जुन्या तक्रारीवर चौकशीची मागणी; तत्कालीन सरकारवरही आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दिल्लीत झालेल्या खून प्रकरणाची (Shraddha Walkar Murder Case) समाजातील सर्व स्तरांवरून टीका होत आहे. 28 वर्षीय आफताब पूनावाला याने स्वतःची लिव्ह-इन पार्टनर, श्रद्धा वालकरची, 18 मे रोजी निर्घृणपणे हत्या केली. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून तिची हत्या (Shraddha Walkar Murder Case) केली होती. त्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते मोठ्या फ्रिज मध्ये ठेऊन हळूहळू त्याची विल्हेवाट लावली. या प्रकरणात अजून एक महत्वाची माहिती बाहेर आली आहे. श्रद्धा वाळकरने आफताब विरोधात आधीही तक्रार नोंदवली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवाय, बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

माझ्या जीवाला आफताबपासून धोका आहे. आफताब माझी हत्या करू शकतो, अशी लेखी तक्रार श्रद्धाने आफताब विरोधात नोंदवली होती. तुळींज पोलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०२० रोजी तिने ही तक्रार नोंदवली होती. नंतर २३ दिवसांनी तिने ही तक्रार मागे घेतली. या संदर्भात ट्विट करत आशिष शेलार म्हणतात, ‘श्रद्धा वालकरने २३ नोव्हेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पत्रानुसार तिच्या जीवाला धोका असून तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. महाराष्ट्र पोलिसांनी या पत्राची दखल का घेतली नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव होता का? नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे ३५ तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एका भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूर पद्धतीने केला. या सर्वांची चौकशी सुरु असताना हे पत्र माध्यमांसमोर आले आहे. या पत्राची रिसिव्हड कॉपी देखील माध्यमांवर दिसत आहे.’

शेलार पुढे लिहितात, ‘महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलिस या विषयावर थंड का बसले? आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलिस या पत्रावर का कारवाई करत नव्हते? श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की, तो आफताब होता म्हणून? सरकारमध्ये बसलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थन होते म्हणून? की या सर्व प्रकारावर पांघरूण घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे, ही काळाची गरज आहे. पोलिस आणि तत्कालीन सरकारने कडक कारवाई केली असती तर श्रद्धा वाचली असती. माझी पोलिसांना विनंती आहे की, हे पत्र दाबण्यात आले का? याची चौकशी दडपण्यात आली का? आफताबवर कारवाई होऊ नये, याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.’ अशी मागणी त्यांनी केली आहे. (Shraddha Walkar Murder Case)

 

त्याच वेळी, श्रद्धा वाळकरने केलेल्या तक्रारींबद्दल तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “श्रद्धाने अर्ज दिल्यानंतर आम्ही २६ दिवस त्याची चौकशी करत होतो. आमचे अधिकारी दोन वेळा श्रद्धा आणि आफताबच्या घरी जाऊन आले. दोघांना पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र श्रद्धा आणि आफताब यांच्यामध्ये समझोता झाल्याने हा अर्ज २६ दिवसांनी निकाली काढण्यात आला.” अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title :- Shraddha Walkar Murder Case | bjp ashish shelar statement over shraddha walker murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Devendra Fadnavis | सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून विधान, म्हणाल्या – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’

Pune Rural Police | अल्पवयीन मुलांना वाहन देणे पालकांना पडले महागात, पोलिसांकडून पालकांवर खटले दाखल

Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Issue | महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात जाणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…