जन्माष्टमीला जरूर घरी आणा ‘या’ 7 वस्तू, कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
जन्माष्टमीचा सण मंगळवार, 11 ऑगस्टला साजरा केला जाईल. कोरोना संकटात जन्माष्टमीला बहुतेक दरवर्षीसारखा उत्साह दिसू शकणार नाही. परंतु, या सणाच्या दिवशी तुम्ही अशा 7 वस्तू खरेदी केल्या पाहिजेत ज्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतात. या वस्तूंचा उल्लेख महाभारतात स्वत: श्रीकृष्णाने युधिष्ठिरसोबत केला होता. जाणून घेवूयात या 7 वस्तू कोणत्या…
1. चंदन
घरात चंदन असणे खुप शुभ मानले जाते. याच्या सुगंधाने वातावरणातील नकारात्मकता नष्ट होते. सर्व देव देवतांच्या पूजेत चंदनाला विशेष महत्व आहे. चंदनाचा टिळा लावल्याने मनाला शांतता मिळते. कारण कपाळावर ज्याठिकाणी आपण टिळा लावतो तेथे अज्ञाचक्र असते.
2. वीणा
घराती एखाद्या शांत-एकांत ठिकाणी वीणा सुद्धा ठेवली पाहिजे. वीणा घरात ठेवल्याने स्वरस्वती मातेची कृपा होते. घरातील सर्व सदस्यांच्या बुद्धीचा विकास होतो. ती घरात आणताच समस्या आपोआप सुटू लागतात. घरात पैशांची कमतरता भासत नाही.
3. गाईचे तूप
भगवान श्री कृष्णाला गाय खुप प्रिय आहे. घरात गाईचे तूप नेहमी ठेवावे. नियमित त्याचे सेवन करावे. यामुळे शक्ती मिळते. शरीर निरोगी राहाते. घरात तूपाचा दिवा लावावा. पूजेत तूपाला खूप महत्व आहे.
4. मध
तुमच्या स्वयंपाक घरात मध नसेल तर या जन्माष्ठमील नक्की घेऊन या. घरात मध ठेवल्याने अनेक वास्तू दोष शांत होतात. पूजेतही मध जरूरी असते. ते सर्व देवी-देवतांना अर्पण केले जाते.
5. स्वच्छ पाणी
घरात नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. पाहुण्यांचे स्वागत थंड आणि स्वच्छ पाण्याने करा. असे केल्याने कुंडलीमधील अनेक दोष दूर होतात. मनुष्याच्या डोक्यावरील संकटांचा भार कमी होतो.
6. बासरी
भगवान श्रीकृष्णाला प्रिय असणारी बासरी घरात ठेवल्यास, पैसा आणि प्रेमाची कमतरता भासत नाही. वास्तुनुसार सुद्धा ती घरात ठेवणे शुभ समजले जाते. बांबूची बासरी घरात ठेवल्याने गृहक्लेश दूर होतात.
7. बाल गोपाळ
संतती सूखापासून वंचित असणार्यांनी भिंतीवर बाल-गोपाळाचे छायाचित्र लावावे. यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होते.