अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – लहान मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहरात बुधवारी सायंकाळी गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तीन जण व पळताना दोन जण असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीरामपूर शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अंगणात खेळणार्या मुलांच्या वादातून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून श्रीरामपुरमधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झालेल्यांमध्ये शरीफ रशीद शेख, जमील रशीद शेख, फरीद रशीद शेख (सर्व रा. हुसेननगर, श्रीरामपूर), तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे आरोपी जखमी झाले. शेख रफद शेख रशीद, सय्यद मुजीब सय्यद (रा. ओरंगाबाद) हे पळताना पडून जखमी झाले आहेत.
जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्याच आरोपींनी गोळ्या झाडल्याची घटनास्थळी चर्चा होती.
Visit : Policenama.com
- मन नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी ‘हे’ 6 नियम आवश्य पाळा, जाणून घ्या
- सौंदर्यवाढीसाठी ‘टी बॅग्ज’चे ‘हे’ 4 फायदे माहित आहेत का ? जाणून घ्या
- कामाच्या ठिकाणी मनस्वास्थ्य सांभाळा, ‘या’ १० गोष्टी लक्षात ठेवा
- आनंदी जीव जगण्यासाठी अट्टाहासाचे भूत आवरा, ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- कामाचा डोंगर उपसण्यासाठी उर्जा कशी मिळवाल ? ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
- फिटनेससाठी ‘हे’ आहेत अगदी सोपे 6 उपाय, लवकर सुरू करा !
- ‘या’ 5 कारणांमुळे महिलांना अकाली मृत्यूची जास्त शक्यता, जाणून घ्या