‘…म्हणून सोडलं बॉलिवूड’, अभिनेत्री मल्लिका शेरावतनं केले अनेक धक्कादायक खुलासे !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. मल्लिकानं बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सध्या मल्लिका चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ख्वाहिश आणि मर्डर सनेमानंतर तिला अनेक चांगले सिनेमे मिळाले होते. शादी के साईड इफेक्ट्स, वेलकम, डबल धमाल असे अनेक सिनेमे तिला मिळाले. सध्या बॉलिवूड पासून दूर असलेल्या मल्लिकानं यामागील खरं कारण सांगितलं आहे.

अलीकडेच झालेल्या एका मुलाखतीत बोलताना मल्लिका म्हणाली, “माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ऑफरमध्ये अभिनेता, दिग्दर्शक निर्माता यांची अपेक्षा असते की, मी हॉट सीन देईन. कमी कपडे घालेल. त्यांची मागणी पूर्ण करेन.”

पुढे बोलताना मल्लिका म्हणाली, “मी त्यांच्या मागणीला बळी पडण्यास तयार नव्हते. मी हॉट देईन, छोटे कपडेही घालेन परंतु माझ्या मरजीनंच. इतरांच्या इच्छेप्रमाणं काही करणार नाही. मला इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध लोकांची भीतीही वाटत होती. मल वाटलं की, बॉलिवूडमध्ये काम करणं अवघड आहे.” असंही ती म्हणाली.

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमांपासून दूर असणाऱ्या मल्लिकानं डिजिटल डेब्यू केला आहे. ‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित झाली होती. अल्ट बालाजीची ही पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरीज होती. यात मल्लिका भूत बनली होती. सीरीजमध्ये तिच्याव्यतिरीक्त तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.