विरोधातील अनेक भाजपात येण्यासाठी उत्सुक, पवारांच्या बाजूनं एकतरी माणूस शिल्लक राहतो का ते पहावं
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शिवसेना भाजपची वाट धरली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यावरून आता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर टीका करत त्यांना इशारा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत ५० पेक्षा अधिक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगत त्यांच्यावर टीका केली आहे. तसंच आगामी काळात पवारांच्या बाजूने एक आकडी संख्या असणारे लोकही राहतायेत का याकडे त्यांनी बघावं, असा सल्लाही त्यांनी दिला.
आपल्या पक्षातून लोक का जात आहेत याचे त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्याचं खापर भाजपावर फोडलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच ईडी, एसीबी यांची नियमित चौकशी सुरु आहेत. त्यांच्या चौकशीत कुठेही मुख्यमंत्री हस्तक्षेप करत नाही. त्यामुळे पवारांनी केलेले आरोप हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी केले जात आहेत, असे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले आहे. तसंच आम्ही पक्ष वाढवतो आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन नवीन नेते, नवीन कार्यकर्ते आमच्याकडे येतात, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, पवारांनी आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आपलं कुठे चुकतं हे बघावं. इतकी वाईट परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादीवर आली आहे. नवीन पिढी त्यांच्याकडे जायला तयार नाही. तर येत्या आठवडाभरात अनेक पक्षप्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- व्यर्थ मानले जाणारे ‘हे’ रोप, स्त्री-पुरुषांच्या ‘या’ समस्यांवर रामबाण औषध
- महिलांच्या ‘मासिक’ चक्रासह कामेच्छाही ‘प्रभावित’ करतो ‘हा’ आजार, जाणून घ्या
- कॅन्सरपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, जाणून घ्या
- ‘कफ’, ‘पित्त’ आणि ‘वात’ का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
- मक्याचे कणीस खाण्याच्या खास पद्धती, ‘हे’ फायदे होतील, जाणून घ्या
- डोकेदुखीमध्ये करू शकता ‘हे’ ७ घरगुती उपाय, त्वरित मिळेल आराम
- ‘या’ धातूच्या भांड्यातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी घातक; जाणून घ्या
- पौष्टिक तत्त्वे वाढवण्यासाठी भाज्या खाण्याच्या ७ सोप्या पद्धती, जाणून घ्या
- शुध्द तुपाचा ‘असा’ वापर केल्याने केस पांढरे होणार नाहीत, जाणून घ्या इतर १० फायदे
- ‘या’ १० गोष्टींमुळे भंग होते एकाग्रता, जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी