नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये एक देश एक संविधान आम्ही प्रत्यक्षात आणले. जम्मी काश्मीरमधील ३७० कलम कायमचे हटविले. आता अनेकांना ते अतिशय महत्वाचे आणि चांगले होते असे वाटत आहे. जर त्यांना ते इतके महत्वाचे होते, तर ६० वर्षे तसेच का ठेवले ते कायमस्वरुपी टिकावे म्हणून प्रयत्न का केले नाहीत?, असा प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्यात त्यांनी सर्वप्रथम काश्मीरमधील कलम ३७० वर भर दिला. ते म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये आजवर दहशतवाद आणि परिवारवाद जोपासला गेला. ३७० कलमामुळे काश्मीरचा विकास खुंटला होता. जे झाले ते चांगले झाले नाही हे त्यांनाही माहिती होते. त्यामुळेच गेल्या ६० वर्षात त्यांनी तो कायमस्वरुपी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला नाही. पण तो कायमचा हटविण्याचे त्यांच्यात धाडस नव्हते. आम्ही पुन्हा सत्तेवर आल्यावर ७० दिवसात ते करुन दाखविले. आता काश्मीरमधील आदिवासी, दलितांना अधिकार मिळणार आहे. काश्मीर आणि लडाख यांनाही विकासाचा हक्क आहे. कलम ३७० हटविल्यामुळे त्यांना तो आता मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
- सकाळपासून संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यासाठी अवश्य करा ‘हे’ ५ उपाय
- हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक
- विविधि फुलांमध्ये सुध्दा असतात औषधी गुणधर्म, ‘हे’ रामबाण उपाय जाणून घ्या
- खुर्चीवर बसून करा व्यायाम, जिममध्ये जाण्याची गरज नाही, होतील ‘हे’ फायदे
- उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत रामबाण उपाय, अवश्य करा
- महिलांनी ‘या’ हार्मोनल असंतुलनाच्या संकेताकडे करु नये दुर्लंक्ष, अन्यथा होतील दुष्परिणाम
- वजन वाढू नये म्हणून महिलांनी घ्यावी ‘ही’ काळजी, होतील ‘हे’ फायदे
- ‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान
- काही दिवसातच वाढेल स्पर्म क्वालिटी, फक्त ‘या’ पदार्थाचे करा सेवन
- कानात लपलेले असू शकतात ‘या’ ५ आजारांचे संकेत, कसे ओळखाल, जाणून घ्या