पोलीसनामा ऑनलाईन टीम – आगामी विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी पक्षांतर केले असून काही नेते युतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं खिंडार पडलं आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. साळुंखे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वसनीय व कट्टर समर्थक मानले जातात. साळुंखे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. सांगोला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे जोरदार वारे वाहत आहे. गेल्या काही दिवसापासून दीपक साळुंखे हे राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्राद्वारे त्यांनी राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या राजीनामा पत्रात आगामी विधानसभेसाठी सांगोला तालुक्यात लक्ष देण्यासाठी वेळ हवा आहे असे राजीनाम्याचे कारण सांगितले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांच्यानंतर माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
- तोंडामध्ये दिसणारे ‘हे’ ५ संकेत सांगतात, तुम्हाला कँसर तर नाही ना
- झोपण्याच्या अर्धा तासापूर्वी प्या खजूरचे दूध, होतील ‘हे’ ५ जबरदस्त फायदे
- ‘पॉप कॉर्न’ खाल्ले तर कधीही होणार नाहीत ‘हे’ आजार, ‘हे’ आहेत ८ फायदे
- ‘बेकिंग पावडर’ने मारु शकता घरातील सर्व झुरळ, वाचा ४ सोप्या पद्धती
- सावधान ! जीवघेणे आहे वायुप्रदूषण, होऊ शकतात अनेक आजार, असा करा बचाव
- १५ दिवस अगोदरच मिळतात ‘हार्ट फेल्युअर’चे ६ संकेत, दुर्लक्ष करू नका
- हार्ट अटॅक, कार्डियक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमधील फरक माहित आहे का ?
- अशी आहे सकाळी उठण्याची योग्य पद्धत, होतात ‘हे’ ४ फायदे
- रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ ‘विलायची’, सकाळी पाहा याची ‘कमाल’
- झोपण्यापूर्वी प्या १ ग्लास ‘गरम पाणी’, जाणून घ्या होतात ‘हे’ ६ फायदे