कानपूर : वृत्तसंस्था – एकीकडे पुलवामा हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून वारंवार टीका केल्या जात आहेत. विरोधकांना नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.आज सर्व जग पाकिस्तानवर दबाव टाकत असताना भारतातल्या काही लोकांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मदत होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. शुक्रवारी कानपुर येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारतीय हवाई दलाने शौर्य दाखवून भारताची शक्ती दाखवून दिली. सर्व देशाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र काही पक्ष हवाई दलाच्या शौर्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे.अशा लोकांपासून सावध राहा असंही ते म्हणाले.
काश्मिरी नागरिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, लखनऊ येथे झालेल्या एका काश्मिरी नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगितलं. काही माथेफिरूंनी काश्मिरी नागरिकावर हल्ला केला. हे अतिशय निंदनिय कृत्य आहे. नागरिकांनी अशा घटनांना थारा देऊ नये. उत्तर प्रदेश सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.