कलयुग ! वडिल झोपेत घोरत होते, पोराला राग आला अन् …

पीलभीत/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था जन्मदात्या वडिलांचा शुल्लक कारणावरून लाठी-काठीने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील पीलभीत येथे घडली आहे. रात्री झोपेत वडील घोरत होते. त्यावरून मुलामध्ये आणि वडिलांमध्ये वाद झाले. हा वाद एवढे टोकाला गेला की मुलाने वडिलांना बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने वडिलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
ही घटना मंगळवारी उत्तर प्रदेशातील पीलभीत जिल्ह्यातील सौधा या गावात घडली आहे.

वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मुलगा घटनास्थळावरून फरार झाला आहे. रामस्वरुप (वय-65) हे पत्नी आणि दोन मुलं नवीन आणि मुकेश यांच्यासोबत सौधा गावात रहात होते. या घटनेच्यावेळी लहान मुलगा मुकेश त्याच्या आईसोबत कार्यक्रमाला गेला होता. त्यावेळी घरामध्ये मोठा मुलगा नवीन आणि वडिल रामस्वरूप हे दोघेच घरामध्ये होते.

नवीन आणि रामस्वरुप यांच्यामध्ये घोरण्यावरुन वाद सुरु होते. मंगळवारी रात्री ते दोघेच घरात होते. रात्री झोपताना नवीन याने वडिलांसोबत घोरण्यावरून पुन्हा वाद सुरु झाला. त्यामुळे संतापलेल्या नवीन याने काठीने मारहाण करत वडिलांचा खून केला. घटनेनंतर नवीन फरार झाला. ही माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. पोलिसांनी नवीन याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.