मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड दोन प्रसिद्ध कलाकार यांच्यामधील वादाची चर्चा खुप रंगली होती. हे दोन कलाकार म्हणजे प्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामधील वादांना खुप उधाण आले होते. अजुनही ते अप्रत्यक्षपणे एकमेकांवर आरोप लावत आहे. ते कसे ? सविस्तर जाणून घेऊया.
कंगनाचा आगामी चित्रपट ‘मेंटल है क्या’ २९ मार्च २०१९ ला प्रदर्शित होणार होता. आणि नंतर याचित्रपटाची तारीख पुढे घेऊन २१ जून करण्यात आली. त्याचबरोबर ऋतिकच्या ‘सुपर ३०’ चित्रपटाला सुरुवात झाली. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. परंतु, याच तारखेला कंगनाने ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची घोषणा केली. मीटूमध्ये दिग्दर्शक विकास बहलचे नाव आल्याने ‘सुपर ३०’ चित्रपटाचे निर्माते अडचणीत आले होते.
त्यांनी या चित्रपटाचे काम पुर्ण न झाल्याने तारीख पुढे घेत असल्याचे सांगितले व चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख २६ जुलैला केली. आता कंगनाने पुन्हा ‘मेंटल है क्या’ चित्रपटाची तारीख २१ जून न घेता २६ जुलै केली आहे. आता एकाच दिवशी या दोघांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची स्पर्धा चांगलीच रंगणार आहे. सध्या ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे.
बालाजी मोशन पिक्सर्सच्या ऑफिशियल सोशल मिडिया अकाऊंटवरुन ७ मे ला एक व्टिट आले होते. यामध्ये असे लिहले होते की, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ चित्रपट दुसऱ्या चित्रपटासोबत क्लॅश करणार आहे.