कोल्हापूर-तिरुपती मार्गावर 3 फेब्रुवारीपासून रेल्वे धावणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमुळे गेल्या 10 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर- तिरुपती रेल्वेसेवा आता 3 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस 1 फेब्रुवारीपासून धावणार आहे. त्यापाठोपाठ 3 फेब्रुवारीपासून कोल्हापूर- तिरुपती मार्गावर विशेष रेल्वे मार्गावर धावणार आहे. त्याचे बुकिंग येत्या चार दिवसांत सुरू होईल, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ही सेवा पूर्ववत झाल्याने कोल्हापूर- तिरुपती प्रवास करणा-यांना याचा लाभ होणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्ववत करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने आता या सर्व गाड्या सुरू केल्या जात आहेत. कोयना आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस नंतर महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्स्प्रेस सुरू होत आहे.