‘या’ 9 उपायांनी दूर करा तुमचे ‘ग्रह-दोष’, जीवनात मिळेल सफलता आणि यश

पोलीसनामा ऑनलाइन – मानवी जीवनावर ग्रहांचा प्रभाव असतो. आपल्याला इतरांपासून वेगळं बनवणारी आपली कुंडली असते. ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. ग्रहांच्या स्थितीला ठीक करणं खूप महत्त्वाचं असतं, तेव्हाच आपलं जीवन सुखी आणि समृद्धी होईल. ज्योतिष शास्त्रात यावर अनेक उपाय आहेत त्याचा उपयोग करून तुम्ही ग्रहदशा दूर करु शकता.

1. कुंडली मध्ये मजबूत सूर्य असणं गरजेचं आहे. याने तुम्हाला समाजात प्रतिष्ठा आणि मान सन्मान मिळेल. सूर्याची स्थिती जर कमजोर असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सूर्याला प्रभावित करण्यासाठी वाहत्या पाण्यात गुळ प्रवाहित करा.

2. चंद्राचे कमजोर होणे तुम्हाला अनेक मानसिक समस्या निर्माण करू शकते. चंद्राला प्रभावित करण्यासाठी दूध किंवा पाणी एका भांड्यात घ्या आणि डोक्याजवळ ठेऊन झोपा. सकाळी उठून ते लिंबाच्या झाडाच्या मुळाशी टाका.

3. मंगळाला शांत करण्यासाठी मिठाई किंवा गोड पदार्थ दान करा. तसेच बताशे एखाद्या नदीत प्रवाहित करा. हनुमानाची पूजा करा.

4. बुध ग्रहाला प्रभावित करण्यासाठी एखाद्या तांब्याच्या नाण्याला छिद्र पाडा आणि ते पाण्यात प्रवाहित करा.

5. गुरूला प्रभावित करण्यासाठी घरात सुगंधित धूप जाळा.

6.शुक्राला प्रभावित करण्यासाठी कपड्यांवर अत्तर लावा. दोन मोती घ्या त्यापैकी एक पाण्यात प्रवाहित करा आणि एक तुमच्याकडे ठेवा. शुक्रवारी आंबट खाऊ नका.

7. शनिवारी एका भांड्यात तेल घ्या त्यात एक नाणं टाका आणि त्यात तुमचा चेहरा पहा नंतर ते तेल एखाद्या गरजवंताला दान करा.

8. राहुला प्रभावित करण्यासाठी मुळी दान करा.

9. केतूला प्रभावित करण्यासाठी दोन कुत्र्यांना भाकरी खाऊ घाला.