राज्यातील E-Pass बंद होण्याची शक्यता कमीच, विजय वड्डेटीवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने टाळेबंद बाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात ई-पास निर्बंध उठवावे अशा सूचना केल्या आहेत. मात्र, यासाठी राज्य सरकार अनुकूल नसल्याचे सूर उमटत आहेत. ई-पास बंद करण्यासंदर्भात राज्य सरकार अनुकूल नाही. ज्यांना गरज आहे अशांनाच ई पास दिला जातो असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.

केंद्राच्या नियमानंतर राज्य सराकर काय भूमिका घेते याकडे अनेकांचे लक्ष आहे. राज्य सरकारची उद्यापर्यंत नवीन नियमावली येईल असे सांगितले जाते. राज्य सरकारच्यावतीने जिम शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्रा घेतला जात आहे. ई-पास वरून लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ई-पास रद्द करावा अशी जोरदार मागणी आहे. पण ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असल्याने राज्य सरकार याबाबत फारसे अनुकूल दिसत नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यासह काही वरिष्ठ अधिकार्‍यांची सकाळी बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत नवीन नियमावली जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे .