‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांनी दिलं राज ठाकरेंना ‘या’ गोष्टीचं ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा कायद्याला (CAA) देशभरातून विरोध होत आहे ज्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर  वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली. शांततेत आंदोलन करणार असल्याचेही सांगतही वंचितच्या आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करत CAA चा निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हे आरोप फेटाळले जात आहे. आंदोलन करणारे कार्यकर्ते वंचितचे नव्हते, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

सीएएच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या विधानावरून प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आंबेडकर म्हणाले कि, राज ठाकरे भडकविण्याचे काम करत आहे. जर आपण एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळली असेल तर त्यांनी राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी द्यावी. पुरावे नसताना राजकीय भाषणबाजी करायची याला अर्थ नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच आंदोलनाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले कि, बूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. आंदोलन हिंसक बनविण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली. वंचितचे कार्यकर्ते चेहरे लपवून आंदोलन करत नाहीत. आंदोलन बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचं षडयंत्र केलं जात आहे. पोलिसांनी त्या लोकांचा शोध घेत कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हंटले होते कि, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विशिष्ट भागांत अन्य देशांतील मौलवींची ये-जा वाढली असून तिथे काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पना नाही. तरी प्रत्यक्षात तिथे काहीतरी भयंकर शिजत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता मी स्वतः यासंदर्भात लक्ष घालून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून याची माहिती देणार आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या या महाराष्ट्र बंदला काँग्रेस, एमआयएम, माकपसह जिल्ह्यातील १५० संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच वंचित बार्शीतील शिवसेनेचे कार्यकर्ते या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र आंदोलनादरम्यान काहींनी हिंसक कृत्य केलं. सोलापुरात सिटी बसवर दगडफेक करुन काही लोक पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.

फेसबुक पेज लाईक करा –