नवरा मुलगा मंडपात नवरीला घालत होता ‘मंंगळसुत्र’, मुलीला दिसला ‘बॉयफ्रेन्ड’ अन् दिला लग्नास ‘नकार’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लग्नाचा मंडप तयार होता, वरातही आली होती आणि वर- वधू मंचावर उपस्थित होते. लग्नाच्या विधी सुरूच होणार होत्या तेवढ्यात असे काही झाले ज्याचा विचार देखील कोणी केला नसेल. एखाद्या चित्रपटाच्या सीनप्रमाणे वधूने लग्नाच्या विधी बंद केल्या आणि लग्नाची इच्छा नाही असे सांगून लग्नाचा मंडप सोडला.

दरम्यान, ही घटना तेलंगणातील वानपार्टी जिल्ह्यातील चारलापल्ली गावची आहे. जिथे लग्नाच्या विधी चालू होत्या. वराने मंगळसूत्र बांधण्यापूर्वी वधूने लग्नाची इच्छा नाही असे सांगून सर्वांना चकित केले. नातेवाईकांनी वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही, त्यानंतर वधू हॉलच्या बाहेर गेली. माहितीनुसार, वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तिने लग्नात तिचा प्रियकर पाहिला आणि त्यानंतर तिने हे पाऊल उचलले. लग्नातील एका पाहुण्याने सांगितले की आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही.