सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीला मोदी सरकारची मंजूरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज राष्ट्रीय भरती एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही खूप चांगली बातमी आहे. राष्ट्रीय भरती एजन्सी कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (सीईटी) चे आयोजन करेल. यातून सरकारी नोकरीच्या निवडीसाठी विविध परीक्षांना हजेरी लावलेल्या उमेदवारांना आता एकच समान परीक्षा द्यावी लागेल. सरकारचे सचिव सी चंद्रमौली म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये २० हून अधिक भरती संस्था आहेत. आम्ही आतापर्यंत फक्त तीन एजन्सी परीक्षा सामान्य करत आहोत. परंतु कालांतराने आपण सर्व भरती एजन्सींसाठी सीईटी देऊ शकाल. सीईटी गुणवत्ता यादी तीन वर्षांसाठी वैध असेल.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, हे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक सुधारणांपैकी एक आहे. यामुळे भरती, निवड, नोकरीत सुलभता येईल आणि खासकरुन त्या वर्गाचे आयुष्य सुलभ होईल, ज्यांना कधी लाभ मिळाला नाही.
Union Cabinet approves setting up of 'National Recruitment Agency' to conduct Common Eligibility Test. This decision will benefit job seeking youth of the country: Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/oSbo1sIAus
— ANI (@ANI) August 19, 2020
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी राष्ट्रीय भरती एजन्सी तयार करण्याचा प्रस्ताव जाहीर केला होता. ही संगणक-आधारित ऑनलाईन परीक्षा असेल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र स्थापित केले जाईल.