तब्बल 70 पोलिसांनी जमीन रिकामी करण्यास सांगितलं, रागात येवून मुलानं पिलं ‘विष’
भोपाळ : वृत्तसंस्था – गुनामध्ये एका शेतकरी कुटुंबावर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना समोर आल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांना ते भारी पडले आहे. या प्रकरणात गुनाचे एसपी आणि जिल्हाधिकारी यांना काढून टाकले गेले, तर दुसरीकडे त्याबाबत राजकारणही तीव्र झाले आहे. दरम्यान गुना पीडितेच्या आईने या संपूर्ण घटनेविषयी सांगितले. त्यांनी सांगितले, “७० पोलिस आले आणि त्यांनी ही जमीन रिकामी करण्यास सांगितले कारण ती सरकारी जमीन आहे. आम्ही त्यांना विनंती केली कि पिकाची कापणी झाल्यावर आम्ही सोडून देऊ. परंतु त्यांनी आम्हाला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. माझ्या मुलाने रागात विष खाल्ले आणि पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.”
70 policemen came & asked us to vacate land saying it belongs to govt. We requested them to let us reap agriculture produce first. But they started abusing & beating us. My son took poison in anger but police ignored. We admitted him to hospital: Mother of victim in Guna incident pic.twitter.com/g8n1Ft4E2K
— ANI (@ANI) July 16, 2020
खरं तर, गुना जिल्ह्यातील कॅंट पोलिस ठाण्याच्या जगनपूर चक्रात मंगळवारी महसूल विभाग आणि पोलिस पथक जमीनीवरील अवैध कब्जा हटवण्यासाठी गेले होते. हीच जमीन राजकुमार या शेतकर्याने घेतली आहे. ही जागा यापूर्वीच विज्ञान महाविद्यालयाला देण्यात आली आहे आणि पोलिसांनी यापूर्वीच अवैध धंद्यातून ती रिकामी केली आहे. मंगळवारी कारवाईसाठी आलेल्या प्रशासनाला शेतकरी जोडपे म्हणाले की, पीक कापणीपर्यंत थांबा. पोलिसांनी ऐकले नाही आणि जेसीबी चालवला.
यावेळी एका शेतकरी दाम्पत्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचा निषेध म्हणून या जोडप्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मध्य प्रदेशातील गुनामधील शेतकऱ्यांसह झालेल्या अमानुष घटनेबद्दल राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, हे मध्य प्रदेश आहे, इथे कायद्याचे राज्य आहे. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोपाळ येथून पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुना येथे जाणार आहे आणि दोषींना सोडले जाणार नाही. तसेच विरोधकांनी या घटनेवर प्रश्न विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या घटनेविषयी राहुल गांधी यांनी ट्विट केले की, आपली लढाई याच विचारसरणी आणि अन्यायाविरूद्ध आहे. राहुल यांच्या या ट्विटला उत्तर देताना नरोत्तम मिश्रा म्हणाले, जेव्हा राहुल गांधी यांचे सरकार होते तेव्हा प्रीपेड सिस्टम अंतर्गत अधिकाऱ्यांची पोस्टिंग होत असत. आम्हाला माहिती मिळताच जिल्हाधिकारी एसपी आयजी सर्वकाही बदलले. याबाबत बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी ट्वीट केले की, ‘गुना पोलिस आणि मध्य प्रदेशातील प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली दलित कुटुंबाने कर्ज घेऊन तयार केलेले पीक जेसीबी मशीनद्वारे काढून त्या जोडप्याला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास भाग पाडणे हे खूप क्रूर आणि अत्यंत लज्जास्पद आहे. या घटनेचा देशव्यापी निषेध स्वाभाविक आहे. सरकारने कडक कारवाई करावी.’