Lockdown -5.0 : दिल्ली ‘अनलॉक’ झाली मात्र एका आठवड्यासाठी ‘सीमा’ केल्या ‘सील’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन 5 अंतर्गत सवलती देण्यात आल्या असल्या तरी दिल्लीच्या लगतच्या सर्व सीमा सील राहतील अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की सध्यातरी दिल्लीच्या सर्व सीमा बंद असल्या तरी केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना येण्या-जाण्यासाठी परवानगी असले. सरकारी कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दाखवून किंवा पास दाखवून दिल्लीत ये-जा करता येईल.
In autos, e-rickshaws and other vehicles, as per earlier orders, the number of passengers was fixed. But now we are lifting the restrictions on the number of passengers travelling in auto, e-rickshaws and other vehicles: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/oNukPNXAXT
— ANI (@ANI) June 1, 2020
केजरीवाल म्हणाले की, जर सीमा सुरु ठेवल्या तर देशभरातून लोक येथे उपचारांसाठी येण्यास सुरुवात करतील. कारण दिल्लीची आरोग्य सेवा ही सर्वात चांगली आहे आणि या ठिकाणी उपचार मोफत आहेत. दिल्लीत सध्या 9500 बेडवर 2300 लोक भरती झाले आहेत. जर सीमा सुरु केल्या तर सर्वच बेड भरुन जातील.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन मुद्यांवर दिल्लीतील जनतेचे मत मागवले आहे. एक म्हणजे दिल्लीच्या सीमा बंदच ठेवायच्या आणि दुसरे इतर राज्यातील लोकांना दिल्लीत उपचारासाठी येणाऱ्या लोकांना येऊ देयचे नाही. केजरीवाल यांनी सांगितले की, आपले मत शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ईमेल करून किंवा व्हॉट्सअॅपवर कळवू शकता. यासाठी केजरीवाल यांनी ईमेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. इमेल करण्यासाठी [email protected], whatsapp: 8800007722 व्हॉईसमेल: 1031 यावर आपले म्हणणे पाठवू शकता. जर तुमच्याकडे व्हॉट्स्अॅप नसले तर 1031 वर कॉल करून आपले मत सांगा. तुमच्या मतांचा सरकार विचार करेल.
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– पूर्वी ज्या गोष्टी उडल्या आहेत, त्या सुरुच राहतील
– न्हावी आणि सलून उडले जातील
– ऑटो, ई-रिक्षा सीटनुसार प्रवासी बसतील, मर्यादित प्रवाशांना बंदी
– रात्री 9 ते सकाळी 5 यावेळेत कर्फ्यू असेल
– चार चाकी आणि दुचाकीनुसारच प्रवासी बसतील
– आता बाजारातील सर्व दुकाने उघडतील, तसेच संपूर्ण उद्योग सुरु होतील
दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद सीमा सील
यापूर्वी रविवारी संध्याकाळी नोएडा आणि गाझियाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, सध्यातरी दिल्लीच्या सीमा खुल्या केल्या जाणार नाहीत. नोएडाच्या जिल्हाधिकारी सुहास एल.वाय यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये 42 टक्के संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये दिल्ली कनेक्शन असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे केवळ पास असलेल्या व्यक्तींनाच सीमेवरून ये-जा करता येईल. गाझियाबादचे जिल्हाधिकारी शंकर पांडे म्हणाले की, कोरोनामुळे 20 एप्रिलपासून दिल्लीत ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली असून ही बंदी सुरुच राहणार आहे.