वेगानं बदलतंय ‘हवामान’, मध्य महाराष्ट्रासह देशातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMD चा अलर्ट’
नवी दिल्ली : वृत्त संस्था – बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी जास्त दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. हे मंगळवारी उत्तर आंध्र प्रदेशचा किनारी भाग नरसापुर आणि विशाखापट्टनमहून जाण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली.
आयएमडीच्या चक्रीवादळ विभागाने सांगितले की, याच्या प्रभावामुळे मंगळवारी तेलंगनामध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यांनी म्हटले की, उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिसा आणि विदर्भाच्या दुर्गम भागात पावसाची शक्यता आहे.
आयएमडीने म्हटले, बंगालच्या खाडीत काल तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जास्त दाबात बदलले आहे. हे क्षेत्र 13 ऑक्टोबरला सकाळी पश्चिम-उत्तर-पश्चिमकडे सरकण्याची शक्यता आहे. या दरम्यान, 55-65 किलोमीटर प्रतितास कमाल वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, जो वाढून 75 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहचू शकतो.
हवामान विभागाने म्हटले की, सोमवारी सायंकाळी बंगाची खाडी, आंध्र प्रदेश, ओडिसा, तमिळनाडु आणि पुदुचेरीच्या किनारी भागात वेगवान वारे वाहतील. मंगळवारी सायंकाळपर्यंत आंध्र प्रदेश, ओडिसा, तमिळनाडु आणि पुदुचेरीच्या किनारी भागात समुद्र खवळलेला राहील. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.