Coronavirus : ‘केवळ देवच आपणास वाचवू शकतो’, कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं
बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमधील कोविड-१९ प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असताना राज्याचे आरोग्यमंत्री बी श्रीरामुलू म्हणाले आहेत की, राज्याला फक्त देवच वाचवू शकतो. ते म्हणाले की, महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जनतेचा पाठिंबा आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात कॉंग्रेस अपयशी ठरल्याचा आरोप राज्य सरकारने बुधवारी केल्यानंतर चित्रदुर्गात मंत्र्यांनी हे वक्तव्य केले. नंतर ते म्हणाले की, माध्यमांच्या एका भागाने त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले.
श्रीरामुलू यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले की, “हे (महामारीवर नियंत्रण ठेवणे) कोणाचे काम आहे ते सांगा. फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो. लोकांमध्ये जनजागृती करणे हा एकच उपाय आहे. अशा परिस्थितीत कॉंग्रेसचे नेते राजकारणाच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. हे कोणासाठीही चांगले नाही.”
श्रीरामुलू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपांचे उत्तर देताना त्यात म्हटले गेले होते की, श्रीरामुलू आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के सुधाकर यांच्यात समन्वयाच्या अभावामुळे राज्य सरकार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरले आहे .
Congress is involved in political mudslinging. It's not fine & it won't help them. It's a crucial time. I request Congress leaders to not indulge in loose talk about the issue. It leads to panic among people. We're ready for punishment if we did anything wrong: B Sriramulu(15.07) https://t.co/8CBISCv2tr
— ANI (@ANI) July 16, 2020
कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले की, महामारीचा प्रसार देशात वेगाने होत आहे आणि येत्या दोन महिन्यांत अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, ही महामारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये भेदभाव करत नाही. श्रीरामुलू यांनी बुधवारी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांचा हेतू असा होता कि जोपर्यंत कोविड-१९ ची लस येत नाही, तोपर्यंत देवच आपले संरक्षण करू शकतो.
त्यांनी बुधवारी रात्री उशिरा एका व्हिडिओ संदेशात म्हटले की, “मी म्हटले होते की लोकांच्या पाठिंब्याशिवाय देवानेही आपले रक्षण केले पाहिजे, परंतु माध्यमांच्या एका वर्गाने याचा असा अर्थ घेतला कि श्रीरामुलू कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत असहाय्य झाले आहेत.” ते म्हणाले, “ही लस येईपर्यंत फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो असे सांगण्याचा माझा हेतू होता. ते चुकीच्या पद्धतीने दाखवले जाऊ नये.”