नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील पांडाच येथे सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक गंभीर जखमी झाले होते. नंतर या दोघांनीही आपला जीव गमावला. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरूद्ध सतत कारवाई सुरू आहे. अलीकडे सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे. काल म्हणजेच मंगळवारी श्रीनगरच्या नवाकदल येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. त्यातील एक फुटीरतावादी गट हुर्रियतचा अध्यक्ष मोहम्मद अशरफ खानचा धाकटा मुलगा जुनेद खान होता. दुसरा दहशतवादी तारिक अहमद शेख हा पुलवामाचा रहिवासी होता.
#UPDATE Both injured troopers succumbed to injuries. Reports received that two weapons also been lifted. Details to follow: Border Security Force (BSF) https://t.co/d21CHbA9rj
— ANI (@ANI) May 20, 2020
नियंत्रण रेषेच्या पलीकडे 300 हून अधिक दहशतवादी उपस्थित : J&K डीजीपी
जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी मंगळवारी (19 मे) सांगितले की नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) 300 हून अधिक दहशतवादी उपस्थित आहेत आणि ते भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सिंह म्हणाले होते की जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी करण्याची पाकिस्तानची योजना मोडीत काढण्यासाठी सुरक्षा कर्मचारी पूर्णपणे सतर्कता बाळगून आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या उद्देशाने मोठ्या संख्येने दहशतवादी त्या बाजूला जमले असल्याचे त्यांनी पोलिस मुख्यालयाला सांगितले. काश्मीर खोऱ्यात यापूर्वीही सुमारे चार हल्ले झाले आहेत आणि राजोरी-पुंछ भागात असे दोन-तीन प्रयत्न झाले आहेत. याबाबत चिंता व्यक्त करताना डीजीपी म्हणाले की, पाकिस्तानचे आयएसआय, सैन्य आणि इतर एजन्सी अतिशय सक्रिय आहेत आणि दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी प्रशिक्षित दहशतवादी तयार आहेत.