नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी सोमवारी लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोशाखावर भाष्य केले. त्यावर सत्ताधारी लोकांनी आक्षेप घेतला. संसदीय कामकाजमंत्र्यांनी याला महिलांचा अपमान म्हणत त्यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली. सभापतींनी सौगत रॉय यांची टिप्पणी सभागृहाच्या कार्यवाहीतून हटवण्याचे आदेश दिले.
शून्य मिनिटात टीएमसी खासदाराच्या टीकेवर गदारोळ झाला. यावर अनेक सदस्यांनी आक्षेप नोंदवला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “वरिष्ठ सदस्य असून वैयक्तिक वेषभूषेवर भाष्य करणे, ते काय बोलत आहेत? त्यांनी बिनशर्त माफी मागावी. हा महिलांचा अपमान आहे.” दरम्यान स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, त्यांचे विधान सभागृहाच्या कार्यवाहीतून काढून टाकावे.
Commenting on personal attire…Being a senior member, what is he talking? He should apologise unconditionally. It is an insult to womenfolk: Parliamentary Affairs Minister Pralhad Joshi on TMC MP Saugata Roy's remark on FM Sitharaman, in Lok Sabha.
Remark expunged from record. pic.twitter.com/8cgyhodnke
— ANI (@ANI) September 14, 2020
या दरम्यान टीएमसी खासदाराला आपली चूक लक्षात आली नाही आणि ते वारंवार विचारात राहिले कि त्यांनी चुकीचे काय म्हटले आहे. यात काय चूक आहे? पश्चिम बंगालच्या दमदमचे खासदार सौगत रॉय मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत.
यापूर्वी लोकसभेत कोविड १९ जागतिक साथीच्या विलक्षण परिस्थितीत संसदेचे मानसून अधिवेशन आयोजित करण्याच्या नवीन व्यवस्थेला आज मान्यता देण्यात आली. मात्र विरोधकांना प्रश्नोत्तरांचा तास न करण्याच्या निर्णयाला लोकशाहीचा गळा दाबणारा निर्णय म्हणत तीव्र विरोध दर्शवला. सतराव्या लोकसभेच्या चौथ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी दिवंगत सदस्य आणि माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासह प्रथम एक तासासाठी स्थगित करण्यात आले.
सभापती ओम बिर्ला यांनी एका निवेदनात म्हटले की, असाधारण परिस्थितीत हे अधिवेशन संसदेच्या इतिहासात प्रथमच होईल जेव्हा लोकसभेचे सदस्य राज्यसभेच्या सभागृहात आणि प्रेक्षक रांगेतही बसतील, ज्यांच्या माध्यमातूनच देशातील लोक संसदेचे कामकाज पाहतील. हा प्रयत्न आणि सुरक्षा व्यवस्था खासदारांमधील शारीरिक अंतर राखण्यासाठीच केली गेली आहे. संसदेची कार्यवाही डिजिटल करण्यात आली आहे. मोबाइल ऍपद्वारे उपस्थिती नोंदवली जाऊ शकते, ऑनलाइन प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्यांची उत्तरे मिळू शकतात.