खंत तर आहेच पण योग्य वेळवर ‘खुलासा’, निवृत्तीवर क्रिकेटर युवराज सिंहचं मोठं ‘वक्तव्य’
मैदानात निरोप न मिळायची खंत
या प्रश्नावर बोलताना युवराज म्हणाला कि, मी पूर्णपणे याला खंत नाही म्हणू शकत मात्र जे काही क्रिकेट खेळलो ते स्वतःच्या मेहनतीवर खेळलो. त्यामुळे माझ्या नावाची कुणालाही शिफारस करावी लागली नाही. निवृत्तीचा निर्णय अवघड होता. मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात हि वेळ येतेच, त्यामुळे निर्णय घ्यावा लागतो.
हा प्रश्न कर्णधाराला विचारा
युवराजला विचारण्यात आले कि, तुला अजुन संधी का देण्यात आली नाही त्यावर तो म्हणाला कि, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्याऐवजी बीसीसीआय किंवा भारतीय कर्णधाराला विचारायला हवा. मी माझ्या जीवनात खूप क्रिकेट खेळलो. माझ्या जीवनात काही खंत आहे मात्र वेळ आल्यानंतर मी ती बोलून दाखवेल.
4थ्या क्रमांकावर भाष्य
या प्रश्नावर बोलताना तो म्हणाला कि, भारतीय संघाला सध्या एका उत्तम अशा खेळाडूची चौथ्या क्रमांकासाठी गरज असल्याचे मत त्याने व्यक्त केले. त्याचबरोबर केएल राहुल याला संधी दिल्यानंतर देखील चांगली कामगिरी होत नसेल तर दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याचे मत त्याने व्यक्त केले.
दरम्यान, युवराज सध्या विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळण्याचा आनंद घेत असून लवकरच तो एका नवीन लीगमध्ये आपल्याला खेळताना दिसून येणार आहे.
वयाच्या पंचेचाळिशीत मलायका कशी आहे फिट, जाणून घ्या तिचा ‘डाएट प्लॅन’
फालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
द्राक्षांची कुल्फी : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
अद्रकाचे ‘हे’ घरगुती उपाय माहिती नसतील तुम्हाला, अवश्य ट्राय करा
व्हॅनिला आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी
लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर
टरबूज आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी