मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील साखर उद्योगासमोर अडचणी असतानादेखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात आली आहे. तर देशातील महाराष्ट्र राज्य हे सर्व शेतकर्यांना एफआरपी देणारे पहिले राज्य ठरले आहे. साखरेचा दर २९ वरुन ३१ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,साखर उद्योग जिवंत राहिला तर शेतकरीही चांगल्या प्रकारे जगू शकतो. हे लक्षात घेता सरकार शेतकरी वर्गाच्या कायम पाठीशी उभा आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
एफआरपी म्हणजे काय ?
ऊस तोडीनंतर शेतकऱ्यांना दोन हफ्त्यांमध्ये मोबदला दिला जातो त्यापैकी पहिल्या हफ्त्याला एफआरपी असं म्हणले जाते. पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी पार पडला. या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिह मोहिते पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील आदी नेते उपस्थित होते.
मागील काही वर्षात ऊसावर आरोप होतो की सर्वात जास्त पाणी ऊसाला लागते. आता नवनवीन प्रयोग करणे गरजेच आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. तसेच आमचे सरकार इथेनॉल धोरण तयार करत असून एवढ्या साखरेचा करायच काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.