पोलिसाच्या पत्नीची सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका पोलिसाच्या पत्नीने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. अहमदपूर येथील विद्या नगरात ही घटना घडली आहे. ऐश्वर्या दहिफळे (१८) असे मृत विवाहित महिलेचे नाव असून तिचा विवाह चार महिन्यांपूर्वी झाला होता. चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये असा तगादा लावून सासरचे लोक ऐश्वर्याचा छळ करत होते. याप्रकरणी मृत ऐश्वर्याच्या आईच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ऐश्वर्याचा पती रमन दहिफळ, सासरे माधवराव दहिफळे व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’349ce7ea-d28d-11e8-8af7-15e3d846b26c’]

८ मे २०१८ रोजी रमन नाळराव दहिफळे यांच्यासोबत ऐश्वर्याचा विवाह झाला होता. रमन दहिफळे हे पोलीस शिपाई पदी बिटरगाव येथे नोकरीस आहेत. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून ऐश्वर्यादेखील बिटरगाव येथे राहत होती. लग्नामध्ये १५ लाख रुपये हुंडा देऊनही चारचाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये, म्हणून ऐश्वर्याचा शारिरीक आणि मानसिक छळ सुरू होता. याची कल्पना ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळीला दिली होती. शिवाय १० लाख रुपये देण्यास असमर्थ असल्याचेही सांगितले होते.

[amazon_link asins=’9382314415′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43082960-d28d-11e8-809c-bf786907649c’]

मात्र, १० लाख द्या अन्यथा मुलीला नांदिवणार नसल्याचे रमन दहिफळे यांनी सांगितल्यावर ऐश्वर्या माहेरी अहमदपूर येथे आली होती. तरीही रमनकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. यामुळेच मानसिक तणावात असलेल्या ऐश्वर्याने आई फुले आणण्यासाठी गेली असताना माहेरच्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लग्न जुळत नसल्याने बहीण भावाने विषारी औषध प्राशन करून केली आत्महत्या