‘त्या’ चुकांना मीच जबाबदार, इतक्या वर्षानंतर सुनील शेट्टीची कबुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण अभिनय करताना त्याच्याकडून काही चुका घडल्या ज्या त्याने इतक्या वर्षानंतर मान्य केल्या. करिअर छान प्रकारे चालले असताना त्याच्याकडून काही चुका घडल्या. त्या नेमक्या काय असतील आपण सविस्तर जाणून घेऊया.

एका मुलाखतीत अभिनेता सुनील शेट्टी म्हणाला की, ‘आज मी अक्षय कुमार आणि अजयला पाहतो. तेव्हा मला त्यांचा अभिमान वाटतो. ते माझे खुप जवळचे मित्र आहे. त्यांना पाहता मी आज कुठे आहे, त्यासाठी मी केलेल्या चुकांना स्वतः जबाबदार आहेत. मी भावनेच्या भरात चित्रपट केलेत. कधीच करिअर विषयक प्लॅन केले नाही. जसे दिग्दर्शकाने सांगितले तसे मी चित्रपट करत गेलो. माझ्या अपयशाचे कारण माझ्या चुका आहेत, असे मी मानतो.’

अभिनेता सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि अजय देवगण या तिघांचे करिअर वेगवेगळ्या वळणावर पोहचले. अक्षय आणि अजय दोघेही चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरलेत. पण सुनील शेट्टी अयशस्वी ठरला. काही चुका सुनीलला महागात पडल्या. हे सुनीलने मान्य केले.

अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या करिअरमध्ये धडाकेबाज चित्रपट दिलेत. पण २००० सालानंतर त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे बंद झाले. आता तो क्वचित चित्रपटात काही क्षणासाठी झळकतो. सध्या सुनील शेट्टी दिग्दर्शक प्रियदर्शन एका बिग बजेट चित्रपटात काम करत आहे. याशिवाय ‘हेरा फेरी ३’मध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी एकत्र येणार असल्याची चर्चा पसरत आहे.