IPL 2021 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करणे असेल ‘कठीण’, सुनील गावस्करांनी सांगितलं कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी भारतीय कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला पाठिंबा दर्शविला आहे. गावस्कर म्हणाले की, 5 वेळा चॅम्पियन्सचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. रोहित शर्माने टी – 20 लीगच्या इतिहासात यापूर्वीही इतिहास रचला आहे, पण यावेळेस त्याची नजर हॅटट्रिककडे असेल कारण मुंबई इंडियन्सने 2019 आणि 2020 मध्ये विजेतेपद जिंकले आहे.

कोविड – 19 साथीच्या दरम्यानही दीर्घ विश्रांतीनंतर मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 मध्ये विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरली. आयपीएलचा मागील हंगाम युएईमध्ये झाला होता. आता पुन्हा गावस्कर म्हणतात की, मुंबई इंडियन्स हे स्पर्धकांपैकी एक आहे. मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, पंड्या बंधू आणि जसप्रीत बुमराह उत्तम लयीत आहेत, तर किरोन पोलार्ड आणि ट्रेंट बाउल्टसारख्या खेळाडूंचा फॉर्म कोणापासून लपून नाही.

गावस्कर म्हणाले की, “मला वाटते की मुंबई इंडियन्सचा पराभव करणे कठीण होईल. आम्ही त्यांचे खेळाडू फॉर्ममध्ये येताना पहिले आहेत. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव, ज्याप्रकारे त्यांनी फलंदाजी केली. मुंबईचे भारतीय खेळाडू, ज्यांनी टी20 मालिका आणि एकदिवसीय मालिकेत भाग घेतला,त्यांनो दाखविले कि ते चांगल्या फॉर्ममध्ये आहे. हार्दिक पंड्याची गोलंदाजी मुंबई इंडियन्ससाठी पुन्हा एक मोठी कमाई ठरणार आहे. ” सध्या बीसीसीआयच्या कमेन्टरी पॅनेलवर असलेले गावस्कर म्हणाले की, “हार्दिक पंड्या ज्या प्रकारे फॉममध्ये आला आहे, भारतीय क्रिकेटसाठी त्याला 9 ओव्हरची गोलंदाजी करणे महत्त्वाचे होते. म्हणजे तो 9 ओव्हर खेळण्यासाठी तयार आहे .” ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जूनमध्ये होणार आहे, त्यासाठी अजून वेळ बाकी आहे पण तो परत आला आहे हे मुंबई व भारतीय क्रिकेटसाठी चांगले आहे. “