शतकातील सर्वात मोठया वादळानंतर ‘या’ शहरात आकाशाचा रंगच बदलला, झाला ‘गुलाबी’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कधी कधी आपण खूप निराश असेल तर सुंदर वातावरण आपल्याला एकदम आनंद देऊन जातात. असेच काहीसे घडले आहे. भुवनेश्वरमधून गेल्यानंतर भारतात सर्वात मोठ्या चक्रीवादळ वादळाने असे सुंदर दृश्य सोडले आहे ज्यामुळे लोक आकाशाकडे पाहतच राहत आहे. कोरोनाच्या भयानक संकटातून असे सुंदर देखावे पाहिल्यावर लोकांना थोडा दिलासा मिळत आहे. घडलं असं की, भुवनेश्वरच्या आकाशाचा रंग बदलला होता.

पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रीवादळ अम्फानमध्ये सुमारे 75 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे ओडिशामधील जीवितहानी कमी झाली आहे. चक्रीवादळ अम्फान भुवनेश्वरमधून गेल्यानंतर आकाश गुलाबी व जांभळे दिसू लागले आहे. लोकांनी सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट करण्यास सुरवात केली आहे.

वादळानंतर झालेल्या या नैसर्गिक प्रक्रियेला स्कॅटरिंग असे म्हणतात. यात आकाशात वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. कधीही निळा, हिरवा, लाल, नारिंगी, गुलाबी आणि जांभळा. जेव्हा लहान पाण्याचे थेंब आणि कण वातावरणात वेगवेगळ्या दिशेने प्रकाश प्रतिबिंबित करतात तेव्हा असे सुंदर दृष्य पहायला मिळते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश दिसतो.

जोरदार वादळ आल्यामुळे मोठे थेंब, मॉलीक्यूल आणि कण वातावरणातून काढून टाकले जातात. परंतु अशा छोट्या कणांमध्ये अशा परिस्थितीत आश्चर्यकारक दृश्ये दिसून येतात. ओडिशामध्ये, किनारी भागातून 1.2 लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. ओडिशामधील बालासोर, भद्रक यासह काही किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि वारा आला होता.