महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर ‘चोरी’चा आरोप; ‘या’ महिलेने केला मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध कविता, संदेशाच्या माध्यमातून ते चाहत्यांसोबत संवाद साधत असतात. मात्र नुकतीच त्यांनी एक अशी कविता पोस्ट केली आहे. ज्यामुळे त्यांच्यावर एका महिलेने चोरीचा आरोप लावला आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुकवर एक कविता लिहिली आहे.
थोड़ा पानी रंज का उबालिये
खूब सारा दूध खुशियों का
थोड़ी पत्तियां ख्यालों की..

थोड़े गम को कूटकर बारीक,
हंसी की चीनी मिला दीजिये..
उबलने दीजिये ख्वाबों को कुछ देर तक..!

यह जिंदगी की चाय है जनाब..
इसे तसल्ली के कप में छानकर
घूंट घूंट कर मजा लीजिये…!!

अमिताभ बच्चन यांनी पोस्ट केलेल्या या कवितेवरुन आता वाद सुरू झाला आहे. टीशा अग्रवाल नावाच्या एका महिलेने हा दावा केला आहे की, ही कविता त्यांची आहे. याचे श्रेय मिळायला हवे अशी मागणी केली आहे. टीशाने आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की, जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाही, अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी बिग बी यांच्या फेसबुक पोस्टवरही कमेंट केली आहे.

अग्रवाल या एक कवयित्री असून त्या विविध कविता फेसबुकवर शेअर करत असतात. त्यांनी ही कविता 24 एप्रिल 2020 मध्ये लिहून त्यांनी ती फेसबुकवरही पोस्ट केली होती. चहा या विषयाला धरुन त्यांनी अनेक फेसबुक पोस्ट केल्या आहेत. यावर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.