नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागिकत्व दुरुस्ती कायद्यावर आज सुप्रीम कोर्टानं महत्त्वाची सुनावणी केली आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं नागरिकत्व कायद्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. कोर्टात सुनावणी दरम्यान ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल म्हणाले, “हे प्रकरण सुनावणीसाठी एखाद्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवलं जावं.” त्यांनी कायद्यावर 3 महिन्यांपर्यंत बंदी आणण्याची मागणी केली. एकदा नागरिकत्व दिल्यानंतर ते पुन्हा हिरावले जाऊ शकत नाही. यावर अॅटॉर्नी जनरलनं आक्षेप घेतला. सरकारनं या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातही ही प्रक्रिया सुरु झाली आहे. अटॉर्नी जनरलनं 3 महिन्यांपर्यंत या कायद्यावर बंदी घालण्याच्या मागणीला विरोध केला. या सुनावणीसाठी फेब्रुवारीमधील एखादी तारीख निश्चित करण्यासाठी कपिल सिब्बल यांनी मागणी केली.
Supreme Court does not put stay the #CAA and #NPR process. Court indicates setting up of Constitution Bench to hear the petitions challenging CAA. The bench will work out the schedule for hearing the cases and take up the cases after 5 weeks to pass interim orders. pic.twitter.com/QLXzLhf5vQ
— ANI (@ANI) January 22, 2020
AGनं म्हटलं की, “या प्रकरणी 144 याचिका दाखल झाल्या आहेत ज्यात सरकारकडे 60चीच सूचना आहे. त्यांनी सांगितलं की, आम्हाला सर्वच 144 याचिकांवर उत्तर द्यायचं आहे.” सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, “कोर्टानं सांगायला हवं की, आता कोणतीही नवीन याचिका दाखल होणार नाही. जर कोणाला काही बोलयाचं असेल तर ते इंटरवेंशन अॅप्लिपकेशन दाखल करू शकतात.
सुप्रीम कोर्टात या कायद्यावरील सुनावणीसाठी 140 याचिका लिस्टेड आहेत. यात 131 याचिका या कायद्याच्या विरोधात आहेत तर एक याचिका समर्थनार्थ आणि एक केंद्र सरकारची याचिका आहे.
सीएएच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर केंद्र सरकारनं अद्याप कोणतंही उत्तर दिलेलं नाही. केंद्र सरकारच्या सू्त्रांचं म्हणणं आहे की, या प्रकरणी 60 हून अधिक नव्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. वास्तविक पाहता हे पहावं लागेल की, त्यात काय मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकार सर्वच याचिकांना विरोध करेल असंही सूत्रांनी सांगितलं आहे.
- ‘ब्लॅक कॉफी’ घेता ? वेळीच व्हा सावध ; रिसर्चमधील ‘हे’ 5 धक्कादायक खुलासे !
- सतत वजन कमी-जास्त होणे आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 3 तथ्य
- थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी !
- नारळ पाण्याने वेगाने वजन होईल कमी ! जाणून घ्या 11 फायदे
- ‘युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !