15 दिवस राहणार सूर्यग्रहणाचा प्रभाव, ‘या’ 4 राशींना होणार फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : 2019 चे शेवटचे सूर्यग्रहण संपले आहे. धनु राशीमध्ये सहा राशींच्या संयोगाने लागलेल्या या सूर्यग्रहणामुळे 4 राशींना फायदा मिळणार आहे. पुढील 15 दिवस सूर्यग्रहणाचा परिणाम कायम राहणार असल्याने कर्क, तुळा, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकते.

कर्क :

हे सूर्यग्रहण कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देऊ शकते. पैशांच्या बाबतीत नातेवाईकांशी वाद वाढू शकतात, परंतु पैशाचे नुकसान होण्याची शक्यता नाही. कोणतीही मोठी संधी मिळू शकेल. कौटुंबिक दृष्टिकोनातून देखील हे ग्रहण आपल्यासाठी चांगले असेल.

तुळा :

हे सूर्यग्रहण तुला राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देऊ शकते. घर किंवा जमिनीच्या बाबतीत गुंतवणूक केल्यास फायदा होईल. सूर्यग्रहणानंतर व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या 15 दिवसात पैशाची कसरत होणार नाही तसेच खर्चावर संपूर्ण नियंत्रण असेल. रामरक्षा स्तोत्र वाचल्याने फायदा होईल. लाल फळ दान करा. करिअरमध्ये चढ-उतार येऊ शकतात.

कुंभ :

हे सूर्यग्रहण कुंभ राशीच्या लोकांचे भाग्यही उजळवू शकते. आर्थिक बदलांमध्ये अचानक बदल होत आहेत. अडून राहिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. फायनान्स बाबतीतही सुरू असलेल्या अडथळ्यांपासून तुम्हाला दिलासा मिळेल. तसेच घराची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यताही निर्माण होत आहे. दीर्घ मुदतीच्या नफ्यासाठी गुंतवणूक करण्याची वेळ आहे. भागीदाराशी सल्लामसलत करुन आपण मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. गीता वाचून कपड्यांचे दान केल्याने फायदा होईल.

मीन :

हे सूर्यग्रहण मीन राशीच्या लोकांना काही प्रकरणांमध्ये फायदे देखील देईल. जर या राशीच्या लोकांसाठी आर्थिक फायद्याची शक्यता असेल तर दुसरीकडे, अनावश्यक खर्च वाढू शकतो. त्यामुळे यावेळी कर्ज देण्यास टाळा आणि मालमत्ता गुंतवणूकीची चूक करू नका. विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि अन्न, पाणी दान करा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/