सुशांत सिंग प्रकरण: चौकशीसाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहचले संजय लीला भन्साळी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढला आहे. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी हे आपले वक्तव्य नोंदवण्यासाठी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहचले आहे. पोलिसांनी संजय लीला भन्साळी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांत सिंग राजपूतला ऑफर करण्यात आलेल्या चित्रपटांबद्दल त्यांच्यावर विचारपूस केली जाईल, ज्यावर सुशांत आणि संजय लीला भन्साळी यांच्यात चर्चा होऊ शकली नाही.

या प्रकरणात भन्साळी यांचे नाव तेव्हा समोर आले होते जेव्हा चित्रपटाचे समीक्षक सुभाष के झा यांनी सुशांत सिंग राजपूत यांना तीन चित्रपटांसाठी संजय लीला भन्साळी यांच्याकडे संपर्क साधल्याचे उघड केले होते. यामध्ये बाजीराव मस्तानी, गोलियों की रसलीला राम-लीला आणि पद्मावत यांचा समावेश होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तींसह अनेक चित्रपटसृष्टींमधील कलाकारांना प्रश्न विचारले आहे. ते पाहता आता भन्साळी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.

चित्रपटाचे समीक्षक सुभाष झा यांनी सांगितले होते की, “जेव्हा सुशांत सिंग ‘पाणी’ या चित्रपटाची तयारी करत होता. तेव्हा त्याला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाची ऑफर केली होती. संजय लीला भन्साळी यांनी ही गोष्ट मला सांगितली होती. पण सुशांतला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर भन्साळीने त्याला गोलियों की रासलीला राम-लीला आणि नंतर पद्मावतमध्ये भूमिकेची ऑफर दिली. आजच्या काळात संजय लीला भन्साळी सर्वात मोठा दिग्दर्शक आहे आणि सुशांत त्यांचे तीन चित्रपट स्वीकारू शकला नाही.’

सुशांतने चित्रपटसृष्टीत काम करणे बंद केल्याचे सांगताच सुभाष झा यांचे विधान समोर आले. त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक सुशांतबरोबर काम करत नव्हते. या सर्व बातम्यांना चुकीचे म्हणत सुभाष झा यांनी स्पष्ट केले होते. ते म्हणाले की, सुशांतच्या बाबतीत अशा गोष्टी समोर येत आहेत यात काहीच तथ्य नाही.

दुसरीकडे सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाची प्रतीक्षा करीत आहेत. यात सुशांतची संजना संघीसोबत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे.