पोलिसनामा ऑनलाईन टीम – सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गूढ दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी अनेक दिग्गजांवर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी जोर धरु लागली आहे. त्यात सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘मला असे का वाटतंय सुशांतची हत्या करण्यात आली आहे’, असे ट्विट केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Why I think Sushanth Singh Rajput was murdered pic.twitter.com/GROSgMYYwE
— Subramanian Swamy (@Swamy39) July 30, 2020
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वासह सगळीकडे खळबळ माजली आहे. त्यातच काही राजकीय व्यक्तींनीदेखील या प्ररकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. यातच मला असे का वाटतंय की सुशांतची हत्याच झाली आहे, असे ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. यासोबत त्यांनी एक कागदपत्रदेखील शेअर केले आहेत.
दरम्यान,सुशांतला न्याय मिळावा म्हणून चाहत्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यातच अलिकडेच पार्थ पवार यांनीदेखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.