[amazon_link asins=’B075X5PCX2,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’38e5ffc0-ada0-11e8-ae82-15ef60ed4304′]
यावर मध्य प्रदेशच्या वतीने सर्वोच्च न्यायालयास सांगण्यात आले की, आम्ही याबाबत केंद्राला कृती आराखडा दिला आहे. त्यावर आराखडा नव्हे, धोरण सादर करा, असे न्यायालयाने बजावले. आपल्याकडील नागरिकांनी घाणीत, कचऱ्यातच जगावे, असे या राज्यांना वाटत असेल तर काय करायचे, अशी उद्विग्नता न्यायालयाने व्यक्त केली. तसेच घनकचरा व्यवस्थापनाबाबत योग्य धोरण न आखल्याबद्दल महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येकी तीन लाखांचा दंड ठोठावला.
केरळमधील पुरग्रस्तांसाठी चिमुकल्यांनी चहाचा स्टॉल उभारुन जमवला ५१ हजारांचा निधी
सन २०१६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली तयार झाली. असे असतानाही, गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तराखंड, चंडीगड आदी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांनी त्या नियमावलीस अनुसरून कुठलेही ठोस धोरण आखले नाही. या अनास्थेवर न्यायालयाने बोट ठेवत हा आदेश दिला आहे.