पूरग्रस्तांसाठी ‘स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. नुकसान भरपाई, वाढीव मदत याचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी ३१ ऑगस्टला सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत जाहीर केले आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील महापुराला केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि महाराष्ट्र- कर्नाटक सरकारचा असमन्वयपणा जबाबदार असून सांगलीतील पूरस्थितीला पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार असून दोघांवर कारवाई करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे. त्यासाठी ऊस आंदोलनापेक्षा तीव्र आंदोलन पूरग्रस्तांसाठी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –