पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी, असा एकमुखी ठराव माढ्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात संमत करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत स्वाभिमानीने तीन जागांची मागणी केली आहे. मात्र, हातकणंगलेची जागा वगळता अन्य जागा देण्यास आघाडीची तयारी नाही. त्यामुळे दबावतंत्राचा भाग म्हणून माढा लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याविरोधात राजू शेट्टींना उतरविण्याची भाषा स्वाभीमानीकडून करण्यात येऊ लागली आहे.
गेल्या वेळी सदाभाऊ खोत यांनी या मतदारसंघातून ‘स्वाभिमानी’कडून लढताना जवळपास साडेचार लाख मते मिळवली होती. या मतदारसंघात स्वाभिमानीचे चांगले नेटवर्क असल्याने माढा लोकसभा निवडणूक पक्षाकडून लढवण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून होत आहे.
यंदा हातकणंगलेसोबत राजू शेट्टींनी माढ्यातूनही उमेदवारी करावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह या मेळाव्यात दिसून आला. एका बाजूने रविकांत तुपकर हे शरद पवार यांच्याशी जागावाटपाबाबत चर्चा करत असून स्वाभिमानीने बुलडाणा आणि वर्धा या दोन मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. अजूनही कॉंग्रेस आघाडीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर येत नसताना माढ्यासाठी स्वाभिमानीने केलेला ठराव शरद पवार आणि कॉंग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.
10वी – 12 वीच्या परीक्षेतील कॉपीचा ‘पाथर्डी पॅटर्न’ !
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द