‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवलं’ अशी वादग्रस्त पोस्ट केल्यानं युजर्स भडकले ‘त्या’ अभिनेत्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री स्वरा भास्कर अशा अभिनेत्रींपैकी आहे जी पॉलिटिकल आणि सोशल टॉपिक्सवर आपले मत मांडत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. असेच काहीसे पुन्हा पाहायला मिळत आहे. जेव्हा स्वराने एक आर्टीकल शेअर करत लिहिले आहे की, “मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवले आहे.”

स्वराने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली होती की, “मुघल विजेत्यांच्या रुपात भारतात आले आणि परंतु ते उपनिवेशवादी नाही तर भारतीय म्हणून आठवले जातात. त्यांनी व्यापार, विकसित रस्ते, समुद्र मार्ग, बंदरांना प्रोत्साहन दिले. मुघलांच्या काळात हिंदू सर्वात श्रीमंत होते.” यानंतर स्वरा ट्रोल होण्यास सुरुवात झाली.

काही युजर्स म्हणाले की, “मुघल हे लुटेरे आहेत आणि त्यांनी देशातील अनेक हिंदूंची हत्या केली आहे.” काही युजर्स म्हणाले की, “राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे, मंगल पांडे यांसारखे लोक काय वेडे होते का ?” एका युजरने लिहिले की, “मुघलांबद्दल फक्त एकच गोष्ट चांगली आहे आणि ती म्हणजे त्यांनी देशाचं तितकं नुकसान नाही केलं जितकं इंग्रजांनी केलं होतं.” मुघलांचं समर्थन केल्याने अनेक लोक स्वरा भास्करवर नाराज आहेत.

स्वरा भास्करच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, स्वरा सध्या आपला सिनेमा ‘शीरखुर्मा’ मुळे चर्चेत आहे. फराज़ आरिफ अंसारी हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात सुरेखा सिकरी, दिव्या दत्ता आणि स्वरा भास्कर हे स्टार्स दिसणार आहेत. या सिनेमात कल्याणी मुळे, एलेना रोक्साना, मारिया फर्नांडिस आणि जितिन गुलाटी यांसारखे कलाकारही दिसणार आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त 

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही