T20 World Cup 2022 | टीम इंडियाने झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, ‘या’ दिग्गज खेळाडूने दिला सल्ला

मेलबर्न : वृत्तसंस्था – टीम इंडियाने (India) विश्वचषकात (T20 World Cup 2022) आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तान (Pakistan) आणि नेदरलँड (Netherlands) या दोन संघांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया यंदाचा विश्वकप  जिंकू शकते याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे तीन फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

पाकिस्तान टीमचा झिम्बाब्वेने (Zimbabwe) एका धावेने पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या खेळाडूंवर सर्व स्तरातून जोरदार टीका केली जात आहे. तसेच झिम्बाब्वेच्या खेळाडूंचं कौतुक देखील चाहते करीत आहेत. झिम्बाब्वेचे खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे टीम इंडियाने त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये सावधगिरी बाळगावी असा सल्ला टीम इंडियाचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी दिला आहे.

झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना टीम इंडियाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
झिम्बाब्वेला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडियाने करू नये असेदेखील सुनिल गावस्कर यांनी सांगितले आहे.

Web Title :- T20 World Cup 2022 | sreesanths daughter shot like virat kohli have you seen the video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Brahmastra 2 मध्ये रणवीर सिंग नाही तर ‘हा’ सुपरस्टार साकारणार देव?

Satej Patil | पडद्यामागे काय घडले, ते आता बच्चू कडूंनी बाहेर आणावे – सतेज पाटील

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, म्हणाल्या – ‘टाटा एअरबस बाबत मंत्रिमंडळातील…’