महाराष्ट्र पोलिसांमुळं मोठं संकट टळलं ! ‘तबलिगी’ जमातला इथं करायचा होता ‘कार्यक्रम’

पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीमधली निझामुद्दीने मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील कोरोनाचे संकट अधिक गंभीर झालं आहे. एकीकडे या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही 14 मार्च रोजी तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र सरकारने शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि मोठे संकट टळले आहे. अन्यथा निझामुद्दीनप्रमाणे वसईदेखील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरण्याची भीती होती.

नियोजित कार्यक्रम झाला असता तर या कार्यक्रमाला दिल्लीप्रमाणे देशभरातील तसेच परदेशी नागरिकांनी हजेरी लावली असती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी जानेवारीत परवानगी मागण्यात आली होती. पालघर पोलिसांनी त्यासाठी परवानगी दिली होती. कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी यांनी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक गौरव सिंग यांच्यासोबत बैठक घेतली आणि या कार्यक्रमासंबंधी सविस्तर चर्चा केली. यावेळी किती लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत यासंबंधीही चर्चा करण्यात आली. हजारो लोक कार्यक्रमासाठी हजर राहणार असून यामध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचं यावेळी सांगण्यात आले. यानंतर करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आणि कार्यक्रम रद्द आला.