पुणे : वरिष्ठ निरीक्षकासह महिला उपनिरीक्षकावर कारवाईचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

समर्थ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते आणि महिला उप निरीक्षक गिरीजा म्हस्के यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केल्याचा ठपका प्राधिकरणाने ठेवला आहे. या दोघांनी कर्तव्यात कसूर केला असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणने दिले आहेत. या आदेशाची प्रत राज्याचे अतिरीक्त मुख्य सचिव (गृहविभाग) आणि पुणे पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायाधीश आर. पी. जोशी, सदस्य न्यायाधीश सी. जी. कुंभार आणि न्यायाधीश बी. जी. गाईकर यांनी हे आदेश दिले आहेत. शब्बीर दादामियॉ शेख यांनी याबाबत प्राधिकरणात अपील दाखल केले होते.

बिल्डर केतन जे. वीरा यांनी भवानी पेठेत एसआरए स्किम राबविली आहे. या स्किममधील सिद्धार्थ सोसायटीत शब्बीर शेख राहतात. बिल्डर वीरा यांनी सोसायटीत राहणाऱ्या अपात्र व्यक्तींच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे महावितरणकडून विज मिटर घेतले. हे प्रकरण शब्बीर शेख आणि प्रमोद कदम यांनी उघडकीस आणून महावितरणकडे तक्रार करुन कारवाईची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार महावितरणने वीज मिटर काढून नेले परंतु बिल्डरवर कोणतीच कारवाई केली नाही. अखेर शेख यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने या प्रकरणाची चौकशी करुन महावितरणला बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष करुन कारवाई केली नाही.
[amazon_link asins=’B00IJ5WZAG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bfd8f49-9661-11e8-a201-19df7d5df1dc’]
याप्रकरणी शेख व कदम यांनी तत्कालीन पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांची भेट घेतली होती. त्यांनी समर्थ पोलिसांना तक्रार अर्जावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तरीही समर्थ पोलिसांनी याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेख अणि कदम यांनी प्राधिकरणात धाव घेतली. मोहिते व म्हस्के या बहुतांश सुनावणीवेळी गैरहजर राहत. प्राधिकरणने तोंडी तक्रार दाखलकरून घेण्याच आदेश दिले. त्यानुसार संबंधित बिल्डर व चार अपात्र धारकांवर मार्च महिन्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान सुनावणीला स्थगिती दिली गेली. तसेच, याप्रकरणाचे दोषारोपपत्र किती दिवसात न्यायालयात दाखल करणार, असे विचारण्यात आले. त्यावेळी एक महिन्यात दोषारोपपत्र दाखलकरू असे सांगितले. मात्र, तीन महिने होऊनही दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले नाही. पोलिसांनी शेख यांना योग्य मार्गदर्शन केले नाही. तसेच त्यांनी फौजदारी कायद्यातील कलम १५४ चे उल्लंघन केले. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या माझी दुसऱ्या ठिकाणी बदली झाली आहे, असे मोहिते यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B00RJK90BE’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a591a61a-9661-11e8-a659-1b3a82c78ce8′]
अनेकदा चकरा मारुनही काम होत नसल्याने शेख हे परत एसीबीकडे गेले व त्यांनी महावितरणकडून तक्रार दाखल करण्यात येत नसल्याची माहिती दिली. त्यावर एसीबीने शेख व कदम यांना तुम्ही स्वत: तक्रार करण्याचे सांगितले. त्यानुसार शेख व कदम हे समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. हे प्रकरण आमच्या पोलीस ठाण्यात येत नसून, तुम्ही महावितरण पोलिस ठाण्यात जाण्याचे लेखी देऊन हा अर्ज निकाली काढण्यात आला होता.