शिरुर शहरातील बेशिस्त वाहनांवर कारवाई करा : आमदार अशोक पवार

शिक्रापुर/ प्रतिनिधी( सचिन धुमाळ) –   शिरूर शहरांतर्गत नगर पुणे रस्त्यावर एसटी स्टँड ते विद्याधाम प्रशाला पर्यंत बेशिस्त वाहन चालक, हातगाडी, यांच्यावर कडक कार्यवाही करा पुन्हा कोणत्या निष्पाप नागरिकांचा जीव गेला नाही पाहिजे यासाठी शिरूर नगर परिषद व पोलीसांनी संयुक्तपने पथक स्थापन करावे, कार्यवाही करतांना आमदाराचा भाऊ जरी असला तरी त्यांच्यावर कार्यवाही करा अशा सक्त सूचना शिरूर हवेलीचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी शिरुर नगरपरिषद व पोलिस खात्याला दिल्या आहे.

शिरूर शहरांतर्गत पुणे-नगर रस्त्यावर अपघातात होइन शाळकरी मुलीचा मृत्यू झाला त्यामुळे शिरुर शहरातील बेशिस्त वाहतूकीचा प्रश्न समोर आला होता त्यामुळे तात्काळ शिरूर -हवेलीचे आमदार. अध्यक्ष सार्वजनीक उपक्रम समिती ॲड. अशोक पवार यांनी नगरपालिका अधिकारी व पोलिस अधिकारी यांच्या सोबत बैक घेउन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे वकील सेलचे प्रदेश चिटणीस शिरीष लोळगे, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बिरुदेव काबुगडे गणेश जगदाळे, शिरुर नगर परिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष रंजन झांबरे, सागर नरवडे, हाफिज बागवान, राहील शेख उपस्थित होते.

शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर काल(१जानेवारी) इंदिरा गांधी पुतळ्याजवळ टँकरच्या चाकाखाली आल्याने नऊ वर्ष वयाच्या आयुष दादाभाऊ जाधव या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.

truk-1

आयुष हा आपल्या वडिलांसमवेत शालेय साहित्य आणण्यासाठी येथे आला होता. इंदिरा गांधी पुतळ्याजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारची धडक बसली यात दुचाकीवर मागील बाजूला बसलेला आयुष्य खाली पडला.यादरम्यान मागून येणाऱ्या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली सापडल्याने आयुष गंभीर जखमी झाला.त्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

लहानग्या चिमुरड्याच्या आणि गरीब घरातल्या मुलाचा मृत्यू झाला असून याबाबत आमदार अशोक पवार यांनी हळहळ व्यक्त करत पुन्हा कोणत्याही निष्पाप व्यक्तीचा अशा प्रकारे मृत्यू होऊ नये यासाठी आता आपण सर्वांनी मिळून शिरुर शहरांतर्गत रस्त्याला शिस्त लावू असे आमदार यांनी सांगितले ,शहरांतर्गत रस्त्याचे काम लवकरच सुरू करून हा रस्ता मोठा करू असे यावेळी सांगून व्यापारी नागरिकांनी आपल्या या दुकानात पुढे वाहनांची गर्दी होणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिरूर हे विदर्भ मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर दररोज साधारण अडीचशे एसटी बसेसची वाहतूक होत असते. तसेच शिरूर हे श्रीगोंदा पारनेर अशा तीन तालुक्यांची बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर कायमच वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शहरातून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्यावर पोलिसांनी जड वाहनांना या रस्त्यावर वाहतूक करण्यास प्रतिबंध करावा.नगरपालिका अधिकारी व पोलिस अधिकारी यांना वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करावे.भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नये,म्हणुन योग्य ते नियोजन व खबरदारी घ्यावी अशा सुचना आमदार अशोक पवार यांनी दिल्या .

वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर या मुला बरोबरच वर्षभरात दोघांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप शिरूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी करून, शहरात कुठेही वाहतूक पोलीस फिरकत नसल्याचे त्यांनी सांगून, शिरूर शहरात रात्रीची पोलीस गस्त बंद झाली असल्याचेही त्यांनी सांगून, मध्यरात्री रिक्षांमध्ये मोठे साऊंड लावून शिरूर चे शांतता भंग करत असल्याचे त्यांनी सांगितले.